Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासा, पुणे पोलिसांना न्यायालयाचे आदेश

गेल्या अनेक दिवसांपासून अटकेत असलेले आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना पहिल्यांदा काहितरी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना आता अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासा, पुणे पोलिसांना न्यायालयाचे आदेश
गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 3:33 PM

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून अटकेत असलेले आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर (St Worker Protest) अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना पहिल्यांदा काहितरी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना आता अटकेपासून दिलासा मिळाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहे. सुरूवातीला मुंबईत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनानंतर गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू झाली. ती थेट पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, अकोला, सोलापूरपर्यंत जाऊन पोहोचली. गुणरत्न सदावर्ते यांना आता पुणे पोलीस ताब्यात घेणार होते. मात्र न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते या पोलिसांच्या कोठडीतून त्या पोलिसांच्या कोठडीत फिरत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या अडचणी वाढतच गेल्या, त्यांंना अनेक दिवस कोठडीत काढावे लागले, मात्र आता पुण्यात त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोठडीत

एसटी कर्मचाऱ्यांची कोर्टात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्या घराबाहेरील आंदोलन भडकावल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्यांना पहिल्यांदा मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यांनी काही दिवस मुंबईतल्या पोलीस कोठडीत काढले. त्यानंतर कोर्टात झालेल्या युक्तीवादात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अनेक गंभीर आरोपही करण्यात आले. गुणरत्न सादवर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोपही करण्यात आला. त्यातून त्यांनी मालमत्ता खरेदी केल्याचा दावाही करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या पत्नीलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले. मात्र तोवर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर साताऱ्यात दुसऱ्या एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता.

अटकेपासून मोठा दिलासा

मराठा आंदोलनावेळी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत मुंबई पोलिसानंतर सातारा पोलिसांनी गुणरत्न सादावर्ते यांचा ताबा घेतला. त्यानंतर साताऱ्यातल्या कोर्टानेही काही दिवस त्यांची कोठडीत रवानगी केली. मात्र तोपर्यंत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. साताऱ्यात थोड्या अडचणी कमी होताच गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवस त्यांचा मुक्काम कोठडीत राहिला. आणि कोल्हापुरात थोड्या अडचणी कमी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा पुणे पोलीस घेणार होते. मात्र त्यांना आता अटकेपासून दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वकील गुणरत्न सदावर्ते हे वादात सापडले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिकेवरून त्यांच्यावर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.