AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करा, जरांगे खजूर खाता है ? अंडा खाता है ? काय म्हणाले सदावर्ते ?

जेव्हा एसटीच्या आंदोलनावेळी माझे १२४ बांधव मृत्यूमुखी पडत होते, त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी ताई तुमचे पावले वळली नाहीत, आता मात्र तुम्हाला सुचले. परंतू तुमच्यावर उष्ट्या बाटल्या फेकल्या म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्माची फळं मिळाली आहेत आता तरी सुधरा, जरांगे यांना रसद पुरवणे बंद करा अशी मागणी जयश्री पाटील यांनी केली.

जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करा, जरांगे खजूर खाता है ? अंडा खाता है ? काय म्हणाले सदावर्ते ?
Gunaratna Sadavarte
| Updated on: Aug 31, 2025 | 9:49 PM
Share

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात शुक्रवारपासून उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आता जरांगे यांनी आपण पाणी देखील घेणार नाही असे म्हटले आहे.यावरुन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे पाटील आपल्या उपोषणाची वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे चाचणी करुन घ्यायला काय तयार नाहीत. त्यांचे वजन, नाडीचे ठोके आणि इतर तपासण्या केल्या जात नाहीत असाही सवाल सदावर्ते यांनी केला आहे.

मनोज जरागे यांना भेटायला आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर त्या निघाल्या तेव्हा त्यांच्यावर मराठा आंदोलकांनी पाण्याची बाटली फेकली. त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न केला. यावर वकील सदावर्ते यांनी जे पेरलं ते उगवत असते. शरद पवार आधी मराठ्यांना आरक्षण मिळू शकणार नाही असे म्हणत होते. ते पवार आता घटना बदला असे म्हणत वकीली करत आहेत. अत्यंत गलिच्छ राजकारण शरद पवार करीत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी यावेळी केला. म्हणून सुप्रिया सुळे यांच्यावर उष्ट्या पाण्याच्या बाटल्या फेकल्या गेल्या. लोक सगळं विसरु शकत नाहीत असेही ते म्हणाले.

गुन्हा दाखल करावा

मनोज जरांगे यांचे कार्यकर्ते महिला पत्रकारांशी असभ्यपणे वागत आहेत. काही महिला पत्रकार माझ्याशी बोलत होत्या.दोन मंत्र्यांबातत जरांगे यांनी बेताल भाषा चुकीचे आहे. चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे या दोघा मंत्र्यांवर त्यांनी अश्लाघ्य टीका केली आहे. नितेश राणे यांनी तर चिचुंद्री म्हणाले आहेत. त्यांच्या आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

खजूर खातात की अंडे खातात

जरांगे यांची वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फेत तपासणी केली पाहिजेत.ते उपोषण करतात ते कशावरुन, ते काही तपासणी करायला राजी होत नाहीत. त्यांचे वजन मोजले जाते. त्यांच्या नाडीचे ठोके मोजले जातात. ते उपोषण करताना नेमके काय खातात.. खजूर खातात की अंडे खातात याचा शोध घेतला पाहिजे असाही आरोप सदावर्ते यांनी यावेळी केला आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.