AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : महामहिम राज्यपालांनी वाद निर्माण करू नयेत, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांची नाराजी; म्हणाले…

महाराष्ट्र एकसंघ राहावा, ही सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे राज्यपालांनी अशी वक्तव्य करू नये, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपले स्टेटमेंट (Statement) देऊन विषय संपवावा, असेही पवार म्हणाले.

Ajit Pawar : महामहिम राज्यपालांनी वाद निर्माण करू नयेत, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांची नाराजी; म्हणाले...
अजित पवार/भगत सिंग कोश्यारीImage Credit source: Twitter
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 30, 2022 | 8:31 PM
Share

हिंगोली : महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा चालत नाही. त्यामुळे महामहिम राज्यपालांनी वाद निर्माण करू नयेत, असे मत विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. राज्यपाल्यांनी केलेल्या वक्तव्यावर अखेर अजित पवारांनी मौन सोडले. ते हिंगोलीत बोलत होते. पूरपरिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा, पाहणी ते करत आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat singh Koshyari), त्यांचे वक्तव्य याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, की संविधानिक मनाचा पद आहे. पण अशी काही त्यांच्याकडून स्टेटमेंट होत आहेत. मराठी माणसांनी महाराष्ट्र घडविला आहे. अनेक मोठी माणसे होऊन गेली. अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला. अनेक हुताम्यांनी रक्त सांडले. त्यामुळे महाराष्ट्र एकसंघ राहावा, ही सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे राज्यपालांनी अशी वक्तव्य करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपले स्टेटमेंट (Statement) देऊन विषय संपवावा, असेही पवार म्हणाले.

‘तातडीने मदत झाली पाहिजे’

मंत्रिमंडळासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्ली दौरा करावा लागतो यावर विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार म्हणतात, की मला या बद्दल बोलायचे नाही. पण महिना उलटून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. याबद्दल मला नागरिक, शेतकरी म्हणून असे वाटत, की नैसर्गिक संकटावेळी तातडीने मदत झाली पाहिजे. एक एक महिना सर्व खाती फक्त मुख्यमंत्र्यांकडे आहेत. उपमुख्यमंत्री यांच्याकडे एकही खाते नाही. सगळ्या फाइल्स मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत. मागच्या वेळी 7 मंत्र्यांचे काही महिने सरकार होते. पण खाती विभागलेली होती. त्यांनी कितीदा कुठे जावे याबद्दल मला बोलायचे नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत त्यांच्या दारापर्यंत कशी पोहोचेल याचा विचार झाला पाहिजेत, असे ते म्हणाले.

‘हेच आमचे खरे दुखणे’

मंत्रिमंडळाचा विस्तारही होत नाही आणि हे पावसाळी अधिवेशन ही घेत नाहीत. आमची मागणी आहे ताबडतोब पावसाळी अधिवेशन बोलवा, म्हणजे ज्यांनी दौरे केले ते लोक आपले प्रश्न अधिवेशनात मांडू शकतील. गरज पडली तर कायदे करू शकतील, आता आम्ही जे काही यांना सांगणार आहोत, त्यावर काही होते की नाही हे ही आम्हाला कळायला मार्ग नाही. हेच खरे आमचे दुखणे आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अजित पवारांची पत्रकार परिषद

‘…मग त्यावेळी शिंदेंनी का नाही विरोध केला?’

हिंगोली वसमत येथे 100 कोटी रुपयांचे मॉर्डन मार्केटला मागील सरकारने मंजुरी दिली होती. यावर अजित पवार यांना विचारले असता, हे सरकार सर्व निर्णयांना स्थगिती देत आहे. निर्णय जर चुकीचे होते तर त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी का विरोध केला नाही? त्यावेळीच्या निर्णयांना समर्थन द्यायचे आणि आता मुख्यमंत्री झाल्यावर स्थगिती द्यायची, हे काही बरोबर नाही. आम्ही याबद्दल पावसाळी अधिवेशनात बोलणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत