AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांना टाळी देणे उद्धवना भारी पडले ? मुंबई हातातून निसटण्याची ही १० मोठी कारणे वाचा

हिंदी भाषेच्या सक्तीवर दोन्ही ठाकरे एकत्र जरी आले असले तरी मुंबई सारख्या कॉस्मोपोलिटीन शहरात केवळ मराठी मतदारांवर विसंबून राहणे ठाकरे बंधूंना महागात पडल्याचे म्हटले जात आहे.

राज ठाकरे यांना टाळी देणे उद्धवना भारी पडले ? मुंबई हातातून निसटण्याची ही १० मोठी कारणे वाचा
| Updated on: Jan 16, 2026 | 11:48 PM
Share

मुंबई महानगर पालिकेत उद्धव आणि राज ठाकरे भावांची युती काही खास कमाल करु शकली नाही. दोन्ही भावांचे एकत्र येणे उद्धव ठाकरे यांना सत्तेबाहेर घेऊन गेले आहे. उद्धव ठाकरे यांना ६७ तर राज ठाकरे यांना ६ जागा मिळाल्या आहेत.साल २०२६ चे मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंच्या चुकीच्या निर्णयाचा परिपाक म्हणून लक्षात राहणार आहे. आशियातील सर्वात श्रीमंत नगरी मुंबईत आता मराठी मते काही खास प्रभाव दाखवणारी ठरली नाहीत.

1 – सिंगल बास्केट ब्लंडर

अशी इंग्रजीत एक म्हण आहे की सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नये. त्याकडे दुर्लक्ष करीत राज आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांची संपूर्ण मदार मराठी मतदारांवर केंद्रीत केली. ठाकरे बंधूंच्या या रणनितीमुळे मुंबई रहाणाऱ्या इतर समुदायांनी त्यांच्याशी फारकत घेतली.

2 – महानगरांचे वास्तव्याकडे दुर्लक्ष

मुंबई हे कॉस्मोपोलीटीन शहर आहे. येथे विविध भाषा आणि जातीचे लोक रहात आहेत. येथील मराठी मतदार जरी ३५ टक्के असून ते महत्वाचे आहेत. परंतू मराठी मतदारांमुळे बहुमताचा आकडा गाठता येत नाही हे स्पष्ट झाले. उर्वरित ६५ टक्के लोक मनसेच्या परप्रांतीय धोरणामुळे नाराज होते.

3 – उर्वरित मुंबईचे गणित

मुंबईत २२% उत्तर भारतीय, २०% मुस्लीम आणि १८ % गुजराती,मारवाडी आहेत. यांची संख्या मुंबईच्या विजयात महत्वाची होती. केवळ मराठी मतदानावर विसंबून राहील्याने नुकसानच झाले. राज ठाकरे यांच्याशी उद्धव यांनी समझोता केल्याने इतर सुमदाय नाराज झाले.

4-धर्मनिरपेक्ष कवच हरवले

काँग्रेस सोबत महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची प्रतिमा उदार झाली होती. विविध समुदायांना त्यांना पसंती दिली. परंतू राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केल्याने उदारमतवादी प्रतिमेला धक्का बसून हिंदी आणि गैरमराठी लोकांना ही युती पसंत पडली नाही.

5 – लाऊडस्पीकरचा मुद्दा

राज ठाकरे यांनी मस्जिदवरील लाऊड स्पिकरच्या मुद्यावरुन रान पेटवले होते. त्यामुळे २० टक्के मुस्लीम मतदार नाराज झाले होते. साल २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांचे समर्थन करणाऱ्या मुस्लीम मतदारांनी त्यांची राज यांच्याशी हातमिळवणी पसंद केली नाही.

6 – उत्तर आणि दक्षिण भारतीय

उत्तर आणि दक्षिण भारतीयांसोबत राज ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे या मतदारांनी दोघा बंधूपासून अंतर राखले.उत्तर भारतीय तर आधीच राजवर नाराज आहेत, त्यात भाजपाचे नेते के. अण्णामलई यांच्या वक्तव्याचा राज यांनी समाचार घेतला त्याला शिवीगाळ करणे दक्षिण भारतीयांना नाराज करुन गेले.

7 – मराठी अस्मिता विरुद्ध विकास

ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा निवडणूकीच्या प्रचारात वापरण्याचा प्रयत्न केले.तर महायुतीने विकासाच्या मुद्यांवर मते मागितली. मराठी मतदारांची तरुण पिढीला संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास माहिती असण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे लोकांनी मेट्रो- ३ सह इतर विकास कामांसाठी महायुतीला मते दिली.

8 – महाविकास आघाडीत फूट

२०२४ च्या विधानसभा निवडणूकात युबीटी, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी अशा महाविकास आघाडीमुळे मुंबईत शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या. परंतू राज यांच्या उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केल्याने परप्रांतीय मते राखण्यासाठी काँग्रेसने ठाकरे बंधूंऐवजी मुंबईत फारसा जनाधार नसलेल्या वंचितशी युती करणे पसंद केले.

9 – भाजपा विरोधी मतांची विभागणी

शिवसेना यूबीटी आणि एमएनएस एकत्र निवडणूक लढल्याने काँग्रेसने स्वंतत्र लढण्याचा प्रयत्न केल्याने तिरंगी आणि चौरंगी निवडणूका झाल्या. त्यामुळे उपनगरात विरोधी मतांची विभागणी झाली. याचा मोठा फायदा शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाला झाला.

10 – एक आत्मघाती गोल

मुंबई सारख्या बहुरंगी आणि बहुढंगी शहरात मतांची बेरीज करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी रक्ताच्या नात्याला महत्व देत कुटुंबातील वाद मिठवला असला तर या नादात मुंबईत बहुतांशी जनाधार ते हरवून बसले.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री