AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्ते आहेत तर अपघात होणारच, चिमुरड्याच्या मृत्यूनंतर भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे भयंकर वक्तव्य

बावधन पोलिसांनी ट्रकचा कोणताही थेट धक्का लागलेला नसतानाही केवळ ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे, ज्यामुळे चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्याचा प्रकार घडल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असतानाच आता आमदार शंकर मांडेकर यांच्या वक्तव्याने भर पडली आहे.

रस्ते आहेत तर अपघात होणारच, चिमुरड्याच्या मृत्यूनंतर भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे भयंकर वक्तव्य
Bhor NCP MLA Shankar Mandekar
| Updated on: Aug 18, 2026 | 4:57 PM
Share

भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी भयंकर वक्तव्य केले आहे. रस्ते आहेत तर अपघात होणारच असे निष्ठूरपणे आमदार शंकर मांडेकर यांनी म्हटले आहे.पुणे महापालिका हद्दीतील म्हाळुंगे-नांदे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात रिषभ पाटोळे या चिमुकल्याचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावर पत्रकारांनी याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल केला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी हे चिड आणणारे वक्तव्य केले आहे.

पुणे महापालिका हद्दी म्हाळुंगे – नांदे रस्त्यावर खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात रिषभ पाटोळे या चिमुकल्याचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात ट्रकचा कोणताही थेट धक्का लागलेला नसतानाही केवळ ट्रक चालकावरच बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्याचा प्रकार घडला आहे. रस्त्याची चाळण करणाऱ्या जबाबदार अधिकारी आणि यंत्रणांवर कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, घटनेनंतर स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना संतप्त नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. त्यांनी याप्रकरणात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले.

आमदार काय म्हणाले नेमके ?

रोड आहेत तर अपघात होणार आहे. ज्याची मोठी गाडी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो असे असंवेदनशील वक्तव्य आमदार शंकर मांडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. त्यावेळी त्यांनी पत्रकाराला एकेरी भाषेत तु पत्रकार आहे तर मी जबाबदार आमदार आहे असेही म्हटले. अपघात झाल्यावर गाडी चालकावर गुन्हा दाखल होत असतो. होऊ नये पण काय करणार ? मी काय आवाज उठवत नाही. तुम्ही आज मला प्रश्न विचारताय, मी दोन वर्षे सभागृहात आवाज उठवत आहे. माझ्या उपस्थितीचे कार्ड दाखवू का ? असेही आमदार मांडेकर पत्रकारांना म्हणाले. शेवट गर्व्हमेंट आहे मी तरी काय करणार त्याला असे म्हणत त्यांनी एकप्रकारे हात वर केल्याने संताप व्यक्त होत आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात