AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Monsoon Update : मान्सूनबाबत हवामान विभागाकडून मोठी बातमी; नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

मान्सूनबाबत हवामान विभागाकडून नवा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

IMD Monsoon Update : मान्सूनबाबत हवामान विभागाकडून मोठी बातमी; नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली
| Updated on: Jul 16, 2025 | 5:57 PM
Share

यंदा देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला, महाराष्ट्रात मान्सून सामान्यपणे सात जूनच्या आसपास दाखल होतो, मात्र यंदा 25 मे रोजीच मान्सूननं महाराष्ट्रात एन्ट्री केली. राज्यात मान्सूनची एन्ट्री होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली, राज्यातील अनेक भागांमध्ये त्यावेळी जोरदार पाऊस झाला, मात्र तीस मे नंतर पावसात काहीसा खंड पडला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली, पुन्हा एकदा 20 जूनच्या आसपास पावसानं ओढ दिली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यानं पेरण्यांच्या कामाला वेग आला. मात्र अजूनही अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण असमान आहे. मराठवाड्यात अजूनही म्हणावा असा पाऊस पडला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घालणारी एक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज?  

मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे, सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाही, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो,  दोन-तीन दिवसांत पुणे शहर आणि शहरालगत मोठा पाऊस होणार नाही, मात्र 20 तारखेच्या पुढे पावसाचा जोर वाढेल. असा अंदाज हवामान तज्ज्ञ एसडी सानप यांनी वर्तवला आहे.

दरम्यान मराठवाड्यात यंदा पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे, शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत, मात्र अजूनही म्हणावा असा पाऊस पडलेला नाही. चांगला पाऊस पडला नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. परंतु सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्यानं, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पावसात खंड पडल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये आता पिके सुकत असल्याचं चित्र आहे. जर वेळेवर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं सकंट निर्माण होऊ शकतं.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.