AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : आता नवं सकंट, पुढील 48 तास धोक्याचे, आयएमडीकडून महाराष्ट्रातील या भागांना रेड अलर्ट

पुढील 48 तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, काही भागांना आयएमडीकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

IMD Weather Update : आता नवं सकंट, पुढील 48 तास धोक्याचे, आयएमडीकडून महाराष्ट्रातील या भागांना रेड अलर्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2025 | 5:47 PM
Share

यंदा मान्सून वेळेपूर्वीच महाराष्ट्रात दाखल झाला, तब्बल 12 दिवस आधी मान्सूनं राज्यात एन्ट्री केली. साधारणपणे 7 जूनच्या आसपास मान्सून राज्यात दाखल होत असतो. मात्र यावर्षी 25 मे रोजीच मान्सूननं राज्यात प्रवेश केला. सुरुवातीला काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसानं काहीशी उघडीप दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा पावसानं दमदार पुनरागमन केलं आहे. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

काय आहे हवामान विभागाचा इशारा? 

पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार आज कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, पुढील 24 तासांंमध्ये कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून, या पर्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं सानप यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आता पेरणी करण्यास हरकत नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

मुंबईत मुसळधार पाऊस  

मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरूच आहे. मुंबईला पावसानं झोडपून काढलं आहे. परिणामी आता अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये  पाच फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचलं आहे. सब वे बंद असल्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे. अंधेरी सब वे बंद झाल्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल सुरू आहेत. मुंबईच्या पवई परिसरात देखील सकाळपासून पाऊस सुरू आहे, सकाळी रिमझिम सुरू असलेला पावसाचा आता जोर वाढला आहे.

कल्याण, डोबिवलीला पावसानं झोडपलं 

दुसरीकडे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये देखील पावसाची रिपरिप सुरूच आहे. अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. त्यामुळे शहराच्या सखल भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर इतर सकल भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही या आधीच्या पावसात देखील कल्याण डोंबिवली महापालिकेने केलेल्या नालेसफाईचे पोलखोल झाली आहे.

करुळ घाटात दरड कोसळली 

सतत सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल पाच तासानंतर पुन्हा एकदा करुळ घाटातून वाहतूक सुरू झाली आहे. रस्त्यातून मातीचा ढिगारा हटवण्यात आला आहे.

वीज कोसळून तीघांचा मृत्यू  

दरम्यान दुसरीकडे जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर येथे वीज पडून एकाच कुटुंबातील 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.  शेतात पेरणी करत असताना वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी हे कुटुंब एका झाडाखाली थांबलं होतं. त्याचवेळी झाडावर वीज कोसळून हा अपघात झाला आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप