AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा फटका, रब्बी पिकांचे नुकसान

weather update | राज्यातील वातावरणात बदल होऊ लागला आहे. हिवाळाच्या गारवा जाऊन आता उन्हाचे चटके सुरु झाले आहे. त्याचवेळी आता अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हे संकट असणार असल्याची माहिती आयएमडीने दिली.

अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा फटका, रब्बी पिकांचे नुकसान
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 11, 2024 | 9:10 AM
Share

गजनान उमाटे, नागपूर, दि. 11 फेब्रुवारी 2024 | राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. सरासरी न गाठता यंदा मॉन्सूनने निरोप घेतला. त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. यंदा खरीपचे उत्पादन कमी झाले. तसेच रब्बीची लागवड कमी झाली. कारण राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये जलसाठा नव्हता. यामुळे रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन दरवर्षीप्रमाणे सोडता आले नाही. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा कमी असल्यामुळे जुलै महिन्यापर्यंत पाण्याचा वापर करावा लागणार आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे वातावरण बदलले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सुरु झाला आहे. त्याचवेळी हवामान विभागाने चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे.

नागपूरसह विदर्भाच्या काही भागात शनिवारी रात्री गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यातील काही गावात गारपीटसह पाऊस झाला. यामुळे गहू,हरभरा,कांदा,भाज्यासह रब्बी पिकांचे अवकाळी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झाले आहे. विदर्भाच्या अमरावती, वर्धा,यवतमाळ जिल्ह्यात गारपीट तर गोंदिया जिल्हयात पावसाच्या सरी कोसळल्या.

काय आहे हवामान विभागाचा इशारा

नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. ११, १२ आणि १३ फेब्रुवारीसाठी हा अलर्ट दिला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, काढणीला आलेला हरभरा, तूर पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

का पडणार पाऊस

मध्य भारतात तयार झालेल्या सायक्लॅामीक सर्क्यूलेशनमुळे विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीदरम्यान रिमझिम पाऊस पडू शकतो. 10 आणि 11 फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये पाऊस पडेल. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये 12 ते 15 फेब्रुवारीदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस

पश्चिम बंगालमध्ये १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडू शकतो. 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला, तेलंगणामध्ये १० आणि ११ फेब्रुवारीला आणि केरळमध्ये १४ ते १५ फेब्रुवारीदरम्यान हलका पाऊस पडू शकतो.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...