AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : महाराष्ट्रावर मोठं संकट, 29 जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे.

IMD Weather Update : महाराष्ट्रावर मोठं संकट, 29 जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2025 | 9:19 PM
Share

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे. याचा मोठा फटका हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बसला आहे. विदर्भातही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचं संकट निर्माण झालं आहे, अनेक गावांना पुराचा वेढा पडल्यानं संपर्क तुटला आहे, काही ठिकाणी पुराच्या पाण्यात लोक अडकल्याचं पहायला देखील मिळत आहे. तर काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक देखील ठप्प झाली आहे. यातच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुढील काही दिवस तरी राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.

राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, आयएमडीकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 ते 48 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, सर्वत्र पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

आयएमडीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या मराठवाड्यात नांदेड वगळता सर्व सातही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भात देखील उद्या पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भाला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील गडचिरोली, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी देखील पुढचे 24 तास महत्त्वाचे असणार आहेत. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?