AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat : पुण्यात दुपारपर्यंत कुणाचा बोलबाला; कोणत्या पक्षाचं पारडं जड… जाणून घ्या

मतमोजणी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर बाजी मारली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केला आहे.

Gram Panchayat : पुण्यात दुपारपर्यंत कुणाचा बोलबाला; कोणत्या पक्षाचं पारडं जड... जाणून घ्या
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Dec 20, 2022 | 1:23 PM
Share

पुणे : आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यात तालुक्यात आपली ताकद लावली होती. त्यामध्ये आमदार, खासदार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असते. ग्रामीण भागात या निवडणुकीत मोठा कस लागत असतो. याच सर्व पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील दुपारपर्यन्तच्या आकडेवारीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात 221 पैकी आतापर्यंत 74 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक 46 ग्रामपंचायती तर भाजपकडे 11 ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 6 ग्रामपंचायती तर शिंदे गटाकडे 1 ग्रामपंचायत, काँग्रेसकडे आतापर्यंत 15 ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहे. यामध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत असून ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे पारडं जड असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुळशी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत थेट सरपंच निवडणूकीत तरूणाईचा बोलबाला असून मतदारांनी तरुणाईला अधिक पसंती दिल्याचे चित्र पुण्यातील मुळशी मध्ये आहे.

मतमोजणी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर बाजी मारली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केला आहे.

ग्रामपंचायतसाठी मतदान झाले. तर पौड येथील सेनापती बापट सभागृहात मतमोजणी करण्यात आली. तहसिलदार अभय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही मतमोजणी पार पडली आहे.

परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी परिसरात उमेदवार, प्रतिनिधी तसेच समर्थक यांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे.

मतमोजणी नंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी गुलालाची उधळन करत जल्लोष केला असून यामध्ये राष्ट्रवादीचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

दासवे : स्वाती नितीन मोरे, आडमाळ : पल्लवी हेमंत पासलकर, मोसे : रसवंता काळुराम पासलकर, माळेगांव : नंदा नामदेव चौधरी, भोडे : राजेंद्र रामभाऊ मारणे

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.