AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! नदीला प्रदूषणाचा विळखा; चंद्रभागेचा जीव गुदमरतोय

महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून पंढरपूरचा लौकिक आहे. त्याचबरोबर भीमाशंकरच्या अभयारण्यातून उगम पावलेली भीमा नदी पंढरपूरच्या आध्यात्मिक इतिहासाचा वारसा सांगते. मात्र याच भीमा नदीचा म्हणजेच चंद्रभागेचा श्वास आता गुदमरतोय की काय अशी परिस्थिती पंढरपूरमध्ये निर्माण झालीये. 

सावधान! नदीला प्रदूषणाचा विळखा; चंद्रभागेचा जीव गुदमरतोय
चंद्रभागा नदी
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 9:38 PM
Share

पंढरपूर : देशाची दक्षिण काशी म्हणून पंढरपूरचा (Pandharpur) लौकिक आहे. त्याचबरोबर भीमाशंकरच्या अभयारण्यातून (Bhimashankar Sanctuary) उगम पावलेली भीमा नदी पंढरपूरच्या आध्यात्मिक (Spiritual) इतिहासाचा वारसा सांगते. मात्र याच भीमा नदीचा म्हणजेच चंद्रभागेचा श्वास आता गुदमरतोय की काय अशी परिस्थिती पंढरपूरमध्ये निर्माण झालीये. जगभरातील वारकरी संप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या पांडुरंगाची नगरी ज्या नदीच्या काठावर वसली ती म्हणजे चंद्रभागा नदी. खरंतर भीमाशंकरपासून उगम पावलेल्या या भीमा नदीचे पंढरपूरमध्ये आल्यावर चंद्रभागा असे नामकरण होते. कोट्यवधी वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी चंद्रभागेत स्नान करण्याची प्रथा आहे. मात्र त्या प्रथेत आता बदल होतो की काय अशी परिस्थिती चंद्रभागेच्या वाळवंटात झाली आहे. अतिशय विस्तीर्ण पात्र असलेल्या चंद्रभागा नदीला आता ओढ्याचे स्वरूप आले आहे. नदीत मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून, शेवाळाने नदीचे पात्र व्यापले आहे.

नमामी चंद्रभागासाठी 20 कोटींची तरतूद

वास्तविक पाहता मागील सरकारने नमामी चंद्रभागा प्रकल्पाच्या माध्यमातून नदीतील प्रदूषण थांबवण्यासाठी 20 कोटींची तरतूदही केली होती. या प्रकल्पाद्वारे नदीत येणारे मैलामिश्रित पाणी, औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी रोखण्याचा प्रयत्न याचा समावेश होता. मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प कागदावरच राहिला की काय अशी अवस्था आजच्या घडीला चंद्रभागा नदीची झाली आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातून याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्री हे दोन वेळा आषाढीच्या महापुजेला येऊन गेलेत. तर महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी उध्दव ठाकरेंनी इस्कॉन घाटाचे उद्घाटन करुन, चंद्रभागेची महाआरतीसुध्दा केली होती. मात्र आता खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चंद्रभागेची दुरावस्था झाली आहे.

स्थानिक प्रशासनाची उदासीनता

पंढरपूरला आषाढी वारीसह महत्वाच्या चार वाऱ्या होत असतात. त्याद्वारे लाखो भक्तगण पंढरपूर नगरीत येत असतात. चंद्रभागेतील स्नान हे भाविकांसाठी अतिशय पवित्र मानले जाते. मात्र नदी प्रदुषणाबाबत स्थानिक प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाची उदासीनता आहे. त्यामुळेच नदीच्या या बकाल अवस्थेबाबत बोलण्यास एकही अधिकारी समोर येत नाही. त्यामुळेच भाविकांकडून आता ”नमामी चंद्रभागा” ऐवजी ”क्षमामी चंद्रभागा” हे वाक्य ऐकायला मिळत आहेत. स्थानिक नागरिक आणि राजकीय पदाधिकारी देखील याविरोधात आक्रमक झाले आहेत.

संबंधित बातम्या

शेतकरी कुटुंब मारहाण प्रकरणी आमदार राजू पाटील आक्रमक; आपल्यापेक्षा बिहार भला, ठाकरे सरकारवर निशाणा

ट्रॅफिकमुळेच 3 टक्के घटस्फोट होतात, हा जावईशोध कुठून लावला? विरोधकांच्या प्रश्नाला मिसेस फडणवीसांचं पुराव्यासह उत्तर

नितेश राणे प्रकृती बिघडली? रुग्णालयात ठेवलं जाण्याची शक्यता; तर प्रकृती अस्वास्थ्यावरुन वैभव नाईकांचा जोरदार टोला

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली