AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत हा दुसऱ्यांना जोडणारी शक्ती, आता वेळ आलीये.., मोहन भागवत यांचं स्वयंसेवकांना मार्गदर्शन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-२’चा समारोप कार्यक्रम आज नागपूरच्या रेशीमबाग येथील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये  सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं आहे.

भारत हा दुसऱ्यांना जोडणारी शक्ती, आता वेळ आलीये.., मोहन भागवत यांचं स्वयंसेवकांना मार्गदर्शन
Mohan BhagwatImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 04, 2026 | 10:21 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-२’चा समारोप कार्यक्रम आज नागपूरच्या रेशीमबाग येथील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये  सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं आहे.  युद्ध दुसऱ्या देशांमध्ये होत आहेत. मात्र तेलाची किंमत आपल्या देशात वाढत आहे, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. भारताची आता वेळ आली आहे, जगाल आता भारताची आवश्यकता आहे, कारण भारत हा दुसऱ्यांना जोडण्यारी शक्ती आहे, असं यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत? 

ज्यांचा संबंध नाही असेही देश अमेरिका -इराण युद्धात पिसत चाललेले आहेत. संकट आहेत त्याकडे माणसाचं ध्यान जात नाही. आपण विकास आणि स्वार्थामध्ये फसलो आहोत. भारत कधीकाळी विश्वगुरू होता, हजारो वर्षे आम्ही गुलामगिरी केली,  ज्यांनी आमच्यावर राज्य केले ते आमच्यापेक्षा चांगले कधीच नव्हते. हिंदुत्वाच्या जागरणाचा प्रयत्न स्वामी विवेकानंद दयानंद महर्षी यांच्यापासून सुरू आहे.  आज आमच्या कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास जगभरात करण्यात येत आहे. आता भारताची वेळ आलेली आहे,  मात्र केवळ वेळ देऊन चालणार नाही त्या वेळेसाठी तयार व्हावं लागतं.  भारत विश्वगुरू आहे, मात्र आमची तयारी कुठे आहे?  असा सवाल यावेळी मोहन भागवत यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्याला आता जगाला नवीन मार्ग द्यावा लागेल.  जगाची कॉपी करून चालणार नाही, तर आपल्याला नवा मार्ग तयार करावा लागेल आणि परिश्रम करावे लागणार आहेत. संघाचं नाव समाजाने घेतलं नाही तरी चालेल, परंतु देश, धर्म आपला प्राण आहे. ज्यांच्याजवळ शक्ती आहे त्यांचं जग ऐकतं, लाठी आहे म्हणून जग ऐकतं. भारताला स्वतः उभा राहावं लागेल, जगाला मार्ग दाखवावा लागेल.  आपली भिस्त ही वसुधैव कुटुंबकम ही आहे. त्यामुळे केवळ दर्शक बनवून राहू नका, संघात या, संघाला समजून घ्या आणि प्रत्यक्ष संघाच्या कार्यक्रमात असा गणवेश घालून सहभागी व्हा,  संघाच्या कार्यक्रमात हितेशी म्हणून तुम्ही सहभागी होऊ शकता,  आता वेळ आलेली आहे की आपल्याला राष्ट्राच्या आणि जगाच्या हितासाठी सक्रिय व्हावं लागे, असं आवाहन यावेळी मोहन भागवत यांनी केलं आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत