AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट, सप्टेंबर महिन्यात पावसाबद्दल धक्कादायक अंदाज, ज्याची भीतीच तेच झाले..

Maharashtra Weather Update September : भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सर्वांचेच टेन्शन वाढले आहे. राज्यात दुष्काळाचे सावट बघायला मिळतंय.

महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट, सप्टेंबर महिन्यात पावसाबद्दल धक्कादायक अंदाज, ज्याची भीतीच तेच झाले..
Maharashtra Weather Update September
| Updated on: Sep 01, 2026 | 7:47 AM
Share

जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र, त्याची भर एकट्या जुलै महिन्यात भरून निघाली. ऑगस्ट महिन्यातही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. राज्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा असतानाच एक वाईट बातमी पुढे येतंय. सप्टेंबर महिन्यातही अपेक्षित पाऊस होण्याची शक्यता कमीच आहे. तसा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला. पिके धोक्यात आहेत आणि पावसाने पाठ फिरवली. राज्यातील धरणांची स्थिती चांगली आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली. धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने दिलासा मिळाला. एल निनोचे संकट यंदाच्या मॉन्सूनवर असणार असल्याचे सुरूवातीपासून सांगितले जाते. त्यातच आता पावसाने पाठ फिरवली. राज्यात सप्टेंबरमध्ये सुद्धा पाऊस कमी असल्याचा अंदाज असल्याने संकट वाढताना दिसतंय.

ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरमध्ये ही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर यावर्षी दुष्काळाचे सावट आहे. पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यात अद्यापही पाऊस कोसळला नाही. त्यातच भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात आता हा मोठा इशारा दिला आहे.

1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाल्याची नोंद आहे. भारतीय हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज त्यामध्येच वर्तवला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे. राज्यातील काही भागात दुष्काळाचे थेट संकेत देण्यात आलेत. बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अजूनही मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

इतरही राज्यात पावसाने पाठ फिरवल्याचे बघायला मिळत आहे. एल निनोचा जो अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला तो खरा तर होणार नाही ना.. अशी शंका उपस्थित केली जात आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला आहे. ज्याचा थेट परिणाम भारतातील मॉन्सूनवर होईल, असे सांगितले जात आहे. त्यातच आता सप्टेंबर महिन्याचा अंदाज पुढे आला.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार