AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवामानात मोठा बदल, आज दिवसभर ढगाळ वातावरणासह दुपारी…

उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. सतत बर्फवृष्टी होत आहे. मात्र, राज्यात सध्या उकाडा जाणवत आहे. कधी उकाडा तर कधी पाऊस अशी स्थिती राज्यात बघायला मिळतंय. त्यामध्येच आज राज्यातील हवामान कसे असणारे हे जाणून घ्या.

हवामानात मोठा बदल, आज दिवसभर ढगाळ वातावरणासह दुपारी...
Rain
| Updated on: Feb 04, 2026 | 7:28 AM
Share

राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली. गेल्या दोन दिवसांपासून काही भागात पावसाचा इशारा देण्यात येतोय. आजही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला. डिसेंबर महिन्यात चांगली होती. मात्र, त्यानंतर जानेवारी महिन्यात थंडी गायब झाली. फेब्रुवारीत तर पावसासोबत उकाडा जाणवत आहे. सतत हवामानात बदल होत असल्याने त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे. यासोबतच मुंबईमधील प्रदूषण हा गंभीर विषय बनला. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून सतत वायू प्रदूषणात सतत वाढ होत आहे. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. श्वसनासंबंधित आजारही उद्धभवत आहेत. आजही दिवसभर तापमानात चढउतार बघायला मिळेल. ढगाळ वातावरणासह दुपारच्या वेळी उकाडा जाणवेल.

राज्यात आता गारठा कमी झाला. उलट उकाडा जाणवत आहे. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरीत 34.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील उच्चांकी तापमान रत्नागिरीत होते. राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. सध्या पावसाला पोषक असे वातावरण राज्यात आहे. काही भागात आजही पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतात सध्या मोठं संकट असून कडाक्याची थंडी असून बर्फवृष्टी आणि पाऊस पडत आहे. बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली आहे. हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सकाळी श्यमानता शून्यावर आली. यासोबतच कडाक्याची थंडीही आहे. अनेक भागात थेट शाळांना आणि कॉलेजला थेट सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या.

राजस्थानमध्ये किमान तापमानातही 2-4 अंश सेल्सिअसने घट झाली. पूर्व राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुके पसरले आहे, तर थंड वाऱ्यांमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे  गुलमर्ग, रोहतांग, कुल्लू आणि मनाली सारख्या उंचावरील भागात 5-16 सेमी बर्फवृष्टीसह नवीन बर्फवृष्टी झाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असताना दुसरीकडे राज्यात उकाडा जाणवत आहे.

Follow Us
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं.
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक......
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.