AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर संकट कायम! पाऊस पुन्हा कोसळणार, हवामान विभागाचा मोठा इशारा..

मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. राज्यात अवकाळीचे ढग कायम राहणार आहेत.

राज्यावर संकट कायम! पाऊस पुन्हा कोसळणार, हवामान विभागाचा मोठा इशारा..
Rain
| Updated on: Mar 27, 2026 | 7:13 AM
Share

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच राज्यातील काही भागात कडाक्याची उष्णता आहे तर काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. मराठवाड्यासह काही भागात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस कोसळताना दिसत आहे. पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. सततच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून हाताशी आलेले पिक गेले. सरकारकडून सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस कायम राहणार आहे. मार्च महिना संपत आला आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, सोलापूर, सांगली या भागात आज वादळीऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. कोकणात आज उष्णता अधिक वाढण्याचे संकेत आहेत. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा मोठा इशारा देण्यात आला. दुपारी 12 ते 4 पारा वाढले. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील हवामानात सतत चढउतार बघायला मिळेल. पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर चांदवड शहरासह ग्रामीण भागात आज अवकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून विजाचा कडकडात आणि मेघगर्जना करत सुमारे तासभर पावसाने झोडपून काढले. पावसाचा फटका काढणीला आलेला गहू, हरभरा आणि काढून ठेवलेल्या कांद्याला बसून मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले. मोहोळ तालुक्यातील पापरी गावात द्राक्षबागेचे मोठे नुकसान. गारपीटीने द्राक्षाचे घड जमिनीवर पडल्याने नुकसान. रात्री गारपीट आणि वाऱ्यासह मोठा पाऊस आला. त्यामुळे काढणी सुरु असलेली द्राक्षबाग पूर्णपणे वाया गेलीय. आम्ही एकरी 2 लाख प्रमाणे 7 एकरावर द्राक्षबाग केली होती. त्यातून 50 ते 60 लाख उत्पन्न अपेक्षित होते. मात्र आता हे सर्व नुकसान झाले. सरकारने तात्काळ आम्हाला मदत करावी ही अपेक्षा , असल्याचे एका शेतकऱ्याने म्हटले.

Follow Us
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.