AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन ते देखील वेगवेगळ्या नावाने, कुठे आहेत ?

महाराष्ट्रात रेल्वेचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. तसा रेल्वेचा इतर देशांच्या तुलनेत विचार केला तर भारताचा रेल्वे विस्तारात जगात चौथा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रात एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन ते देखील वेगवेगळ्या नावाने, कुठे आहेत ?
Image Credit source: FACEBOOK
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Sep 28, 2022 | 12:49 PM
Share

Indian Railways : एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या नावांची रेल्वे स्थानके (Railways Station) आहेत. असे तुम्हाला कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. ते देखील महाराष्ट्रातच. महाराष्ट्रात (Maharashtra) असलेल्या अहमदनगर (Ahamdnagar) जिल्ह्यात ही आश्चर्यकारक बाब आहे. श्रीरामपुर आणि बेलापुर ही दोन स्थानकं एकाच ठिकाणी आहे. फक्त या स्थानकांचे रेल्वे ट्रॅक विरुद्ध दिशेला आहे. या स्थानकांमुळे अनेक प्रवाश्यांची दिशाभूल होत असते. त्यामुळे या स्थानाकावरून प्रवास करणाऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. प्लॅटफॉर्म क्रमांक तपासूनच येथे प्रवास करावा लागतो. अन्यथा प्रवाशांचा गोंधळ हा निश्चित असतो.

महाराष्ट्रात रेल्वेचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. तसा रेल्वेचा इतर देशांच्या तुलनेत विचार केला तर भारताचा रेल्वे विस्तारात जगात चौथा क्रमांक लागतो.

याशिवाय ऑस्ट्रेलियाची जितकी लोकसंख्या आहेत तितकेच प्रवासी भारतातील रेल्वेने दररोज प्रवास करतात असा दावा देखील अनेकदा केला जातो.

त्यामुळे भारतातील रेल्वेचा विस्तार बघता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वेचा विस्तार करतांना विशेष काळजी घेण्यात आली आहे.

असे असले तरी महाराष्ट्रात अहमदनगर येथील एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या नावाची असलेली रेल्वे स्थानके अनेकदा चर्चेचा विषय ठरत असते.

याशिवाय असे देखील एक रेल्वे स्थानक आहे जिथे दोन राज्यांची सीमा आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची सीमा असलेल्या ठिकाणी नवापुर रेल्वे स्थानक आहे.

या रेल्वेस्थानकावर एक अशी बाब आहे जी संपूर्ण देशात कुठेही नाही. एकच प्रवासी सूचना ही चार भाषेत केली जाते. त्यात इंग्रजी, हिन्दी, मराठी आणि गुजराती भाषांचा समावेश आहे.

त्यामुळे शक्यतो आपण कुठल्याही रेल्वे स्थानकावर गेलो तर तिथे एकाच स्थानकाचे नाव असते. परंतु महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एकाच ठिकाणी दोन स्थानके असल्याने त्याची अनेकदा चर्चा होत असते.

Follow Us
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा!
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा! नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके म्हणाले..
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके बोलता बोलता हे काय म्हणाले?
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी जाहीर
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! दोन्ही पक्षांकडून सभात्याग
Mumbai | भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! समन्वय समिती निष्फळ; दोन्ही पक्षांकडून सभात्याग
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गड
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गडकरींचं पुन्हा मोठं विधान
पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने शेतात सोडली गुरं
Akola | पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने 4 एकर शेतात सोडली गुरं; अकोल्यात बळीराजा हताश
पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप
MIM Protest In Thane | पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप; ठाणे महापालिकेसमोर मडकी फोडत निषेध
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! पर्यावरणपूरक...
CM Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! 6,500 विद्यार्थ्यांसमोर दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर