AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन ते देखील वेगवेगळ्या नावाने, कुठे आहेत ?

महाराष्ट्रात रेल्वेचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. तसा रेल्वेचा इतर देशांच्या तुलनेत विचार केला तर भारताचा रेल्वे विस्तारात जगात चौथा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रात एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन ते देखील वेगवेगळ्या नावाने, कुठे आहेत ?
Image Credit source: FACEBOOK
| Updated on: Sep 28, 2022 | 12:49 PM
Share

Indian Railways : एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या नावांची रेल्वे स्थानके (Railways Station) आहेत. असे तुम्हाला कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. ते देखील महाराष्ट्रातच. महाराष्ट्रात (Maharashtra) असलेल्या अहमदनगर (Ahamdnagar) जिल्ह्यात ही आश्चर्यकारक बाब आहे. श्रीरामपुर आणि बेलापुर ही दोन स्थानकं एकाच ठिकाणी आहे. फक्त या स्थानकांचे रेल्वे ट्रॅक विरुद्ध दिशेला आहे. या स्थानकांमुळे अनेक प्रवाश्यांची दिशाभूल होत असते. त्यामुळे या स्थानाकावरून प्रवास करणाऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. प्लॅटफॉर्म क्रमांक तपासूनच येथे प्रवास करावा लागतो. अन्यथा प्रवाशांचा गोंधळ हा निश्चित असतो.

महाराष्ट्रात रेल्वेचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. तसा रेल्वेचा इतर देशांच्या तुलनेत विचार केला तर भारताचा रेल्वे विस्तारात जगात चौथा क्रमांक लागतो.

याशिवाय ऑस्ट्रेलियाची जितकी लोकसंख्या आहेत तितकेच प्रवासी भारतातील रेल्वेने दररोज प्रवास करतात असा दावा देखील अनेकदा केला जातो.

त्यामुळे भारतातील रेल्वेचा विस्तार बघता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वेचा विस्तार करतांना विशेष काळजी घेण्यात आली आहे.

असे असले तरी महाराष्ट्रात अहमदनगर येथील एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या नावाची असलेली रेल्वे स्थानके अनेकदा चर्चेचा विषय ठरत असते.

याशिवाय असे देखील एक रेल्वे स्थानक आहे जिथे दोन राज्यांची सीमा आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची सीमा असलेल्या ठिकाणी नवापुर रेल्वे स्थानक आहे.

या रेल्वेस्थानकावर एक अशी बाब आहे जी संपूर्ण देशात कुठेही नाही. एकच प्रवासी सूचना ही चार भाषेत केली जाते. त्यात इंग्रजी, हिन्दी, मराठी आणि गुजराती भाषांचा समावेश आहे.

त्यामुळे शक्यतो आपण कुठल्याही रेल्वे स्थानकावर गेलो तर तिथे एकाच स्थानकाचे नाव असते. परंतु महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एकाच ठिकाणी दोन स्थानके असल्याने त्याची अनेकदा चर्चा होत असते.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.