AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident | अक्कलकोटवरुन दर्शन घेऊन परतणारी गाडी घाटातून दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू

Jalgaon Accident | उत्तर महाराष्ट्रात २४ तासांत दोन मोठे अपघात झाले. नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात रविवारी संध्याकाळी अपघात झाला. त्यानंतर रविवारी रात्री दोन वाजता चाळीसगावमधील कन्नड घाटात भीषण अपघात झाला. त्यात चार जणांचा मृत्यू झाला.

Accident |  अक्कलकोटवरुन दर्शन घेऊन परतणारी गाडी घाटातून दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू
jalgaon chalisgaon accident Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 27, 2023 | 8:46 AM
Share

खेमचंद कुमावत, चाळीसगाव, जळगाव, दि. 27 नोव्हेंबर 2023 | उत्तर महाराष्ट्रात २४ तासांत दोन मोठे अपघात झाले. दोन्ही अपघात धार्मिक कार्यक्रमावरुन परत येत असताना झाले. नाशिकमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधील कन्नड घाटात अपघात झाला. रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात सात जण जखमी झाले आहे. दोन्ही अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घाटात झालेला हा अपघात अत्यंत भीषण होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

कसा झाला अपघात

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या कन्नड घाटात रविवारी रात्री अपघात झाला. रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला आहे. धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तवेरा गाडी दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धार्मिक कार्यक्रमास गेले अन्…

रविवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात रविवारी संध्याकाळी अपघात झाला. या अपघातात रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाचही तरुण ठार झाले. सर्व जण मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. त्यानंतर अक्कलकोट येथून दर्शन घेऊन येणाऱ्या तवेरा गाडीचा रविवारी रात्री दोन वाजता अपघात झाला. हे सर्व जण मालेगावकडे प्रवास करत होते. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहे. या जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

अपघातातील जखमी

  • अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी ,वय 20
  • जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी, वय 17
  • सिधेस पुरुषोत्तम पवार,वय 12
  • कृष्णा वासुदेव शिर्के, वय -4
  • रूपाली गणेश देशमुख,वय 30
  • पुष्पा पुरूषोत्तम पवार,वय -35
  • वाहन चालक – अभय पोपटराव जैन, वय 50

मृतांमध्ये आठ वर्षांची पूर्वा

  • प्रकाश गुलाबराव शिर्के,वय -65
  • शिलाबाई प्रकाश शिर्के,वय -60
  • वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी,वय -35
  • पूर्वा गणेश देशमुख, वय -08
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.