धार्मिक कार्यक्रमाला जातो म्हणून घरातून बाहेर पडले; नाशिकमध्ये अपघातात 5 तरुण ठार

नाशिक जिल्ह्यातील येवला -मनमाड-अहमदनगर महामार्गावर अनकवाडे शिवारात आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि कारमध्ये जोरदार धडक झाल्याने या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. हे पाचही तरुण नाशिक जिल्ह्यातील आहेत. या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

धार्मिक कार्यक्रमाला जातो म्हणून घरातून बाहेर पडले; नाशिकमध्ये अपघातात 5 तरुण ठार
Nashik AccidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 9:00 PM

नाशिक | 26 नोव्हेंबर 2023 : धार्मिक कार्यक्रमाला जातो म्हणून गेलेल्या पाच तरुणांवर काळाने घाला घातला आहे. मनमाडजवळ झालेल्या भीषण अपघातात या पाच तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी होते. हा अपघात अत्यंत भीषण होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या अपघातामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. मात्र, पोलिसांनी युद्ध पातळीवर ही वाहतूक कोंडी दूर केली.

आज सायंकाळी संध्याकाळी 5 वाजता हा अपघात झाला. मनमाडजवळील अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. दोन्ही गाड्या समोरासमोर आल्याने कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघात इतका भीषण होता की उड्डाणपुलावरच कंटेनर उलटला होता. रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाच तरुण या अपघातात ठार झाले आहेत. हे पाचही जण नाशिकचे रहिवासी असल्याची माहिती मिळते.

कंटेनरची जोरदार धडक

रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाचही तरुण मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. धार्मिक कार्यक्रमाला जाऊन संध्याकाळी परत येतो असं त्यांनी घरी सांगितलं होतं. पण येवला मार्गे नाशिकला येत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

कंटेनरची जोरदार धडक बसल्याने कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. कंटेनरही पलटला. या अपघातात हे पाचही तरुण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी कारमधून मृतदेह बाहेर काढले. एव्हाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी हे मृतदेह तात्काळ मृतदेह विच्छेदनासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

वाहतूक कोंडी

नाशिक जिल्ह्यातील येवला -मनमाड-अहमदनगर महामार्गावर अनकवाडे शिवारात हा अपघात झाला. या अपघातामुळे कार आणि कंटेनर महामार्गाच्या मध्येच उलटल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर क्रेनच्या सहाय्याने हा दोन्ही गाड्या बाजूला करण्यात आल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटली. या अपघातामुळे प्रवाशांना तब्बल तासभर वाहतूक कोंडीत अडकावलं लागलं होतं.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.