नव्या भोंदूबाबाचा भयानक कांड, पोलीस बायकोला हाताशी धरून…गुन्हा दाखल होताच बिंग फुटलं!
Jalgaon Crime : नाशिकच्या भोंदूबाबाचे कारनामे समोर येत असताना आता जळगावच्या भिकमचंद जैन नगरातील दांपत्याची भोंदूबाबासह त्याच्या पोलिस असलेल्या पत्नीकडून 11 लाख 32 हजारांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

राज्यात सध्या भोंदू बाबांचा भांडाफोड होताना दिसत आहे. नाशिकच्या भोंदूबाबाचे कारनामे समोर येत असताना आता जळगावच्या भिकमचंद जैन नगरातील दांपत्याची भोंदूबाबासह त्याच्या पोलिस असलेल्या पत्नीकडून 11 लाख 32 हजारांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सिद्धी प्राप्त आहे, अंगात अजमेरचे पीर येतात, असे सांगून घरातील भांडणे थांबवून सुख-शांती मिळवून देतो, असे आमिष दाखवून या जोडप्याची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा ललित पाटील यांच्यासह त्याची पोलीस पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील हिच्या विरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल होऊन साडेतीन वर्षे झाले तरी पोलिसांना संशयित आरोपी सापडलेले नाहीत, त्यामुळे कथित भोंदूच्या शोधासाठी पाडित महिलेने अप्पर पोलिस अधीक्षकांना साकडे घातले आहे. फरार महिला पोलीस व तिच्या भोंदू नवऱ्याच्या शोधासाठी, पोलिसांनी नातेवाईकांकडे तसेच मुंबईसह इतरत्र चौकशी केली, मोबाईलची सीडीआर काढले मात्र त्यांचा शोध लागला नाही. फसवणूक झालेल्या दांपत्याने पैशाची मागणी केली असता, मी अघोरी आहे, माझ्या नादी लागू नका, तुमच्या सात पिढ्या बरबाद करून टाकेल अशी दाम्पत्याला धमकी दिल्याचे देखील समोर आहे. आरोपी महिला पोलीस कर्मचारी असल्यामुळे तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोपही पीडित महिलेने केला असून
काय आहे नेमकं प्रकरण
पीडित महिलेचे तिच्या नवऱ्यासोबत तसेच कुटुंबात वारंवार भांडण होऊन वाद होते. महिलेने तिच्या कुटुंबातील नेहमीच्या वादाबद्दलचा प्रकार पोलीस मैत्रिण असलेल्या महिमा उर्फ मनोरमा हिला सांगितला. मनोरमा हिने माझ्या पतीच्या अंगात अजमेरचे पीर येतात. आम्ही लोकांचे संकट दूर करतो…असे सांगत मैत्रिणीचा तसेच तिच्या नवऱ्याचा विश्वास जिंकला. तिने मुंबई ,दिल्ली, राजस्थान अजमेर या ठिकाणाहून लोक आमच्याकडे येऊन अडचणी सोडून जातात. सर्वांच्या अडचणी आम्ही दूर करतो असे सांगितले.
अनेक ठिकाणी अघोरी पूजा
यानंतर या जोडप्याने भोंदू ची भेट घेतली. यावेळी त्याने म्हटले की, दिराने आत्महत्या केली असून त्याच्या आत्म्याने तुझ्यात प्रवेश केल्याने घरात वाद होत आहे. तुझ्या दिराचा आत्मा तुला त्रास देत असल्याचे भोंदूने सांगितले. वेगवेगळ्या अघोरी पूजा , विधी तसेच होमहवन करण्याच्या नावाखाली वेळोवेळी भोंदू बाबा ने तसेच त्याच्या पत्नीने दाम्पत्याकडून 11 लाख 32 हजार उकळले. भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिर, उज्जैन, गोगामेडी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर येथे बनावट अघोरी पूजा केल्या तसेच उज्जैन येथे थेट स्मशानभूमीत अघोरी पूजा करण्यात आली. या जोडप्याने पैशाची मागणी केली असता, मी अघोरी आहे, माझ्या नादी लागू नका, तुमच्या सात पिढ्या बरबाद करून टाकेल अशी धमकी या जोडप्याला देण्यात आली.