AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात प्रचंड राडा, पोलीस-शिवसैनिकांमध्ये झटापट, सुषमा अंधारेंचा मोर्चा पोलीस ठाण्याच्या दिशेला

पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यातील गोंधळानंतर सुषमा अंधारे इतर पदाधिकाऱ्यांसह पायी पोलीस ठाण्यात गेल्या. या सर्व घडामोडींमुळे जळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

जळगावात प्रचंड राडा, पोलीस-शिवसैनिकांमध्ये झटापट, सुषमा अंधारेंचा मोर्चा पोलीस ठाण्याच्या दिशेला
| Edited By: | Updated on: Nov 03, 2022 | 8:04 PM
Share

जळगाव : जळगावात चोपडा येथील शिवसेनेच्या महाप्रबोधन सभेपूर्वीच गोंधळ झाला. महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत असलेले ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या गदारोळानंतर सुषमा अंधारे इतर पदाधिकाऱ्यांसह पायी पोलीस ठाण्यात गेल्या. या सर्व घडामोडींमुळे जळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सध्या जळगावात सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. या सभांमधून ते गुलाबराव पाटील यांच्यावर प्रचंड निशाणा साधत आहेत.

या महाप्रबोधन यात्रेत ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी हे देखील गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका करत आहेत. त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे अनेक शिवसैनिक त्यांचे चाहते झाले आहेत. पण हे शरद कोळी आता अडचणीत सापडले आहेत. कारण प्रक्षोभक भाषण करण्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस सुषमा अंधारे आणि शरद कोळी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या पी प्राईड हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.

यावेळी पोलीस शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आले होते, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. विशेष म्हणजे शरद कोळी यांना पोलिसांच्या ताब्यात न देण्याचा शिवसैनिकांचा पवित्रा होता. त्यातूनच त्यांच्यात झटापट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

या दरम्यान शिवसैनिक संतप्त झाल्याने पोलिसांसमवेत सुषमा अंधारे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत आणि ठाकरे गटाचे वक्ते पायी शहर पोलीस ठाण्याकडे निघाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.