AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Rain | हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, जळगावमध्ये पावसाची दमदार बॅटिंग

जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने समाधनकारक बॅटिंग केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. पण आता चांगला पाऊस पडल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालीय.

Jalgaon Rain | हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, जळगावमध्ये पावसाची दमदार बॅटिंग
| Updated on: Sep 07, 2023 | 7:41 PM
Share

जळगाव | 7 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं पुन्हा आगमन झालंय. त्यामुळे राज्यातील बळीराजाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या महिन्याभरापासून पाऊस सुट्टीवार गेला होता. शेतकरी चातकासारखी वाट पाहत होते. याशिवाय राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठी संपत आला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाईचं संकट उभं राहण्याची भीती होती. अशा परिस्थितीत पावसाने आगमन केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यातही पावसाने काल रात्री आणि दमदार बॅटिंग केली आहे.

जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालीय. त्यामुळे हतनूर धरणाचे 4 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून पाऊस नसल्याने धरणाचे सर्व दरवाजे बंद होते. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कालपासून पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणाचे चार दरवाजे एक मीटरने उघडले आहेत. धरणातून 9 हजार 959 क्यूसेक्सप्रमाणे पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरु करण्यात आला आहे. हतनूर धरणामध्ये आता 87.63 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

धुळ्यातील नागरिकांनाही दिलासा

दरम्यान, धुळे जिल्ह्यातही पावसाचं आगमन झालंय. धुळे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडलेला नव्हता. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये व्यवस्थित पाऊस पडला होता. पण धुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाऊस पडलेला नव्हता. तिथे पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. ते देवाकडे सातत्याने पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करत होते. अखेर पावसाने आज आगमन केलं आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये महिन्याभरापासून दांडी मारली होती. त्यामुळे सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ झालेली होती. शेतकऱ्यांची पीकं करपू लागली होती. पिकांवर अनेक रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडले होते. तसेच नागरिकही उष्णतेने हैराण झाले होते. मात् काल रात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा हा सुकावला आहे. या पावसामुळे पिके तरारली आहेत. पण अद्यापही जिल्ह्याचा काही भाग पावसाच्या प्रतिक्षेत असून बळीराजा पावसाची आस धरून आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.