AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Rain | हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, जळगावमध्ये पावसाची दमदार बॅटिंग

जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने समाधनकारक बॅटिंग केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. पण आता चांगला पाऊस पडल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालीय.

Jalgaon Rain | हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, जळगावमध्ये पावसाची दमदार बॅटिंग
| Updated on: Sep 07, 2023 | 7:41 PM
Share

जळगाव | 7 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं पुन्हा आगमन झालंय. त्यामुळे राज्यातील बळीराजाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या महिन्याभरापासून पाऊस सुट्टीवार गेला होता. शेतकरी चातकासारखी वाट पाहत होते. याशिवाय राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठी संपत आला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाईचं संकट उभं राहण्याची भीती होती. अशा परिस्थितीत पावसाने आगमन केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यातही पावसाने काल रात्री आणि दमदार बॅटिंग केली आहे.

जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालीय. त्यामुळे हतनूर धरणाचे 4 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून पाऊस नसल्याने धरणाचे सर्व दरवाजे बंद होते. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कालपासून पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणाचे चार दरवाजे एक मीटरने उघडले आहेत. धरणातून 9 हजार 959 क्यूसेक्सप्रमाणे पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरु करण्यात आला आहे. हतनूर धरणामध्ये आता 87.63 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

धुळ्यातील नागरिकांनाही दिलासा

दरम्यान, धुळे जिल्ह्यातही पावसाचं आगमन झालंय. धुळे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडलेला नव्हता. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये व्यवस्थित पाऊस पडला होता. पण धुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाऊस पडलेला नव्हता. तिथे पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. ते देवाकडे सातत्याने पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करत होते. अखेर पावसाने आज आगमन केलं आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये महिन्याभरापासून दांडी मारली होती. त्यामुळे सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ झालेली होती. शेतकऱ्यांची पीकं करपू लागली होती. पिकांवर अनेक रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडले होते. तसेच नागरिकही उष्णतेने हैराण झाले होते. मात् काल रात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा हा सुकावला आहे. या पावसामुळे पिके तरारली आहेत. पण अद्यापही जिल्ह्याचा काही भाग पावसाच्या प्रतिक्षेत असून बळीराजा पावसाची आस धरून आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.