AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करावं” ; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सरकारचं अपयश दाखवून दिलं

या सरकारने कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करायला हवे होते मात्र तसे करण्यात आले नसल्याचे सांगत हे सरकार नाकर्ते असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करावं ; राष्ट्रवादीच्या नेत्यानं  सरकारचं अपयश दाखवून दिलं
| Updated on: Mar 22, 2023 | 6:14 PM
Share

जळगाव : अवकाळी आणि गारपीटाचा फटका राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना बसला आहे. मात्र सरकारकडून नुकसानभरपाईविषयी ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तर दुसरीकडे सरकारमधील मत्र्यांनी अवकाळी आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने राष्ट्र्वादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली होती.

मात्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने एकनाथ खडसे यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पाहण्यास वेळ नसल्याचे सांगत एकनाथ खडसे सरकारवर सडकून टीका केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आता त्यांच्याकडे जाण्यास वेळ नाही.

तसेच अर्थसंकल्प अधिवेशनात सुट्टीच्या वेळेस शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्र्यांना जाता येत होते मात्र त्यांना याबाबत संवेदना वाटत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि नुकसान झालेला पहाणी रात्रीच्या अंधारात केली, पालकमंत्र्यांच्या मतदार संघात न जाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे ,

त्या ठिकाणी जायला हवं होतं, कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करायला हवे होते मात्र तसे करण्यात आले नसल्याचे सांगत हे सरकार नाकर्ते असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.