AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करावं” ; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सरकारचं अपयश दाखवून दिलं

या सरकारने कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करायला हवे होते मात्र तसे करण्यात आले नसल्याचे सांगत हे सरकार नाकर्ते असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करावं ; राष्ट्रवादीच्या नेत्यानं  सरकारचं अपयश दाखवून दिलं
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 22, 2023 | 6:14 PM
Share

जळगाव : अवकाळी आणि गारपीटाचा फटका राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना बसला आहे. मात्र सरकारकडून नुकसानभरपाईविषयी ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तर दुसरीकडे सरकारमधील मत्र्यांनी अवकाळी आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने राष्ट्र्वादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली होती.

मात्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने एकनाथ खडसे यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पाहण्यास वेळ नसल्याचे सांगत एकनाथ खडसे सरकारवर सडकून टीका केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आता त्यांच्याकडे जाण्यास वेळ नाही.

तसेच अर्थसंकल्प अधिवेशनात सुट्टीच्या वेळेस शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्र्यांना जाता येत होते मात्र त्यांना याबाबत संवेदना वाटत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि नुकसान झालेला पहाणी रात्रीच्या अंधारात केली, पालकमंत्र्यांच्या मतदार संघात न जाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे ,

त्या ठिकाणी जायला हवं होतं, कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करायला हवे होते मात्र तसे करण्यात आले नसल्याचे सांगत हे सरकार नाकर्ते असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?