AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीनं टरबूज घातले मातीत; बाजारात कवडीमोल दर..

अवकाळीनंतर जे शेतात उरलेला शेतमाल आहे. त्याला आता बाजारभाव नाही. कवडीमोल दराने शेतमाल विकला जात असल्याने शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.

अवकाळीनं टरबूज घातले मातीत; बाजारात कवडीमोल दर..
| Edited By: | Updated on: Mar 23, 2023 | 3:06 PM
Share

रावेर/जळगाव : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात याचा मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी आता आम्ही जगायचं कसं असा सवाल उपस्थित करत आहे. जळगाव जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. गहू, मका, ज्वारी, कलिंगड आणि टरबूज पीक पूर्णतः वाया गेले आहे.

अवकाळीनंतर जे शेतात उरलेला शेतमाल आहे. त्याला आता बाजारभाव नाही. कवडीमोल दराने शेतमाल विकला जात असल्याने शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.

जळगाव जिल्ह्यात टरबूजाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा टरबूज उत्पादकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

त्यामुळे काढणीला आलेले टरबूज अवकाळी पावसाच्या माऱ्याने खराब झाले आहेत. मात्र शिल्लक राहिलेल्या टरबूजालाही बाजारभाव नसल्याने टरबूज शेतकऱ्यांनी आता आम्ही जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला आहे.

अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने टरबुजाचे मोठे नुकसान झाले आहे.

तर शेतात असणारी टरबूजही अक्षरशः खराब झाले आहेत. त्याचा उत्पन्नावर परिणाम होत असल्याने व्यापारी ही बाजारपेठेत कमी रुपयामध्ये खरेदी करत आहेत.

अवकाळी पावसामुळे टरबूज खराब झाल्याने टरबूजालाही योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतात असलेल्या टरबूजामुळेही आता शेतकऱ्यांना आर्थिक फायदा न होता त्याचा त्यांना तोटाच होऊ लागला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...