AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj jarange Patil | अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणात पहिली अटक, अजित पवार थेट म्हणाले…

Manoj jarange Patil | अंतरवली सराटीमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी पहिली अटक केली. आरोपीकडे पिस्तुल आणि जिवंत काडतूस सापडली आहेत. अजित पवार यांनी या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj jarange Patil | अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणात पहिली अटक, अजित पवार थेट म्हणाले...
First arrest in violence at antarwali sarati
| Updated on: Nov 25, 2023 | 9:09 AM
Share

जालना (दत्ता कनवटे) : दोन महिन्यांपूर्वी अंतरवली सराटीमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. ऋषीकेश बेदरे या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली. जालना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. काल सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास ही अटक करण्यात आली. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले होते. त्यावेळी तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर हे प्रकरण तापलं. याचवेळी पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ऋषीकेश बेदरे आणि त्याच्या 3 सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ऋषीकेशकडून पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त केली आहेत.

अंबड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आरोपींचा मुक्काम आहे. अंबड पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. आज सकाळी 11 वाजता अंबड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीला हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी आरोपींना जामीन मिळतो कि, पोलीस कोठडी हे समजेल. जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण 307 सारख गंभीर कलम लावण्यात आलं आहे. अतरावली सराटीमध्ये झालेल्या दगडफेकीत पोलीस आणि ग्रामस्थ जखमी झाले होते. धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड जाळपोळ करण्यात आली होती. अतरवली-सराटीमध्ये जे घडलं. ते गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत होती. पण आता पोलिसांनी आक्रमक पाऊल उचललं आहे. अटकेवर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

“या प्रकरणात पोलीस दबावाला बळी न पडता कारवाई करतील. तपासातून वस्तुस्थिती समोर येईल आणि ज्यांच्या चूक असतील, त्यांना कडक शासन होईल” असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पोलिसांनी दोन महिन्यांनी पहिली अटक केली आहे, या अटकेवर मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या लोकांना अटक करण्याचा हा कुठला डाव ? असा प्रश्न विचारलाय. “सरकारने आमच्या कार्यकर्त्याना विनाकारण अटक केली. अंतरावली सराटीत आमच्यावर हल्ला झाला. आम्ही कट रचला नव्हता” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.