AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे विमानात बसले नाही, त्यांना शिंदेंनी विमानानं आणलं… शिंदेच्या खासदाराचं विधान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: पाकिस्तानला गेले आहेत. त्यांनी राज्यातील काही नागरिकांना महाराष्ट्रात परतण्यासाठी खास विमानाची सोय करुन दिली. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका खासदाराने यावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

जे विमानात बसले नाही, त्यांना शिंदेंनी विमानानं आणलं... शिंदेच्या खासदाराचं विधान
naresh mhaske
| Updated on: Apr 24, 2025 | 6:24 PM
Share

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिल दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या घटनेनंतर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना राज्य सरकारकडून परत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: पाकिस्तानला गेले आहेत. त्यांनी राज्यातील काही नागरिकांना महाराष्ट्रात परतण्यासाठी खास विमानाची सोय करुन दिली. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका खासदाराने यावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काश्मीरमधून महाराष्ट्रात परतणाऱ्या नागरिकांबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानाने आणलं, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले.

नरेश म्हस्के काय म्हणाले?

“तुम्हाला माहिती आहे का त्या विमानात जवळपास ४५ लोक हे वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत, जे रेल्वेने तिथे गेले होते. तिथे अतिशय वाईट परिस्थितीत होते. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते. हे ४५ लोक आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते, त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदेंनी केली. ते गेल्यामुळे त्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं, जोर मिळाला, काम करण्याची स्फूर्ती वाढली. जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी श्रेयवाद म्हणता”, असे नरेश म्हस्के म्हणाले.

“४५ लोक रेल्वेने गेले होते, पहलगाममध्ये लँडक्रॅश झालं, तिथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये अडकले, गरीब लोक खाण्याचा प्रॉब्लेम होता. त्या लोकांना एकनाथ शिंदेंनी विमानतळावर आणलं ती लोकं पहिल्यांदा विमानात बसतात. रेल्वेने गेलेली लोक आहेत. घाबरलेली लोक आहेत आणि त्यांना महाराष्ट्रात आणलं जात आहे”, असेही नरेश म्हस्केंनी म्हटले.

त्यासोबतच नरेश म्हस्केंनी फेसबुकवर एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात त्यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केले आहे. यात त्यांनी एक कविता म्हटली आहे.

“संकट जिथे तिथे थेट जाऊन उभा ठाकतो तो, गढळलेल्या पाण्यामध्ये थेट पाय टाकतो तो. चर्चा बिर्चा करत नाही समित्या नको बैठका नको, फेसबुक लाईव्ह नको उंटावरून शेळ्या हाकणे नको . तिथे गरज ज्याची आहे ते घेऊन थेट पोहोचतो, म्हणून तर घर कोंबड्यांना तो कायमच बोचतो. इरशाळवाडी असो,असो कोल्हापूरचा पूर इथे जवळ असो वा काश्मिरात दूर, व्रत त्याचं अखंड आहे जनसेवेचा ध्यास आहे लोककल्याणाची बात आहे म्हणून तर तो ‘एकनाथ’ आहे… शिंदे साहेब तुमचे धैर्य निडरता संवेदनशीलता आणि समय सूचकतेला माझा सलाम” असे नरेश म्हस्केंनी म्हटले आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत