AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला गरिबाला..’, भाजप प्रवेशाची चर्चा अन् जयंत पाटलांची मिश्किल प्रतिक्रिया

जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

'मला गरिबाला..', भाजप प्रवेशाची चर्चा अन् जयंत पाटलांची मिश्किल प्रतिक्रिया
_Jayant PatilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2025 | 6:50 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे, यावर आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत, तसेच त्यांनी यावेळी माध्यमांना देखील सुनावलं आहे. तुम्ही माय बाप आहे, तुम्ही चालवलं तेच चालणार. मी इथेच आहे,  पक्षाचा मेळावा घेतोय. तुम्ही असं का करता मला माहीत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? 

भाजपा फार मोठा पक्ष आहे. त्यामुळे मला गरिबाला का सारखं वेठीस धरता. माझ्या भेटी वेगळ्या कारणासाठी होतात. विरोधी पक्षाचे नेते भेटू शकत नाहीत का? असा सवाल यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलता ते म्हणाले की, हे सर्व थांबवा.  तुम्ही पक्षांतरासाठीच भेटलो असेल असा गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही बातमी चालवता मलाही प्रसिद्धी मिळते, माझीही कामं होतात असा खोचक टोला यावेळी जयंत पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पूर परिस्थिती आणि पाऊस यावर देखील प्रतिक्रिया दिली.   यावर्षी पूर येऊ नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पूर येऊ नये यासाठी सरकारने लक्ष घातलं पाहिजे. पाटबंधारे विभागाने योग्य वेळी पाणी सोडलं पाहिजे आणि योग्य नियोजन केले पाहिजे. तसेच अलमट्टी धरणाचा जो प्रश्न आहे त्या भागातील लोकांनी जी मतं मांडले आहेत आंदोलनं केली आहेत सरकारने त्यांचं म्हणणं न ऐकता ज्यांनी आंदोलन केले नाही अशा लोकांना सरकारने बोलावले आहे. मात्र सरकारने  ज्यांनी आंदोलन केलं आहे, अशा लोकांना बोलावून त्यांचे प्रश्न ऐकून घेतले पाहिजे, असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यांनी जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.  यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते  वसंतदादांपर्यंत  या कृष्णाकाठची माणसं विचाराला पक्की होती. याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला पाहिजे होतं. पण आता परिस्थिती बदलली आणि काही वेगळे निर्णय झाले, यावर मी बोलणार नाही, असं जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.