AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण रेल्वे स्टेशन बाॅम्बने उडवू, मध्यरात्री पोलिसांना फोनवरुन धमकी, पुढे काय घडलं?

कल्याण रेल्वे स्थानकावर बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा अज्ञात व्यक्तीचा फोन कॉल मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. कल्याण स्थानकावर बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वाड पाठवून तपासणी करण्यात आली. तीन ते चार तासांच्या ऑपरेशननंतर ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.

कल्याण रेल्वे स्टेशन बाॅम्बने उडवू, मध्यरात्री पोलिसांना फोनवरुन धमकी, पुढे काय घडलं?
Kalyan Bomb Threat
| Updated on: Dec 18, 2024 | 9:51 AM
Share

Kalyan Railway Station Bomb Threat : कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी पोलिसांना मिळाली आहे. मंगळवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन पोलिसांनी ही धमकी दिली. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर पोलील आणि रेल्वे प्रशासनाने तात्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेत बॉम्बचा शोध घेतला. यामुळे रेल्वे स्थानकात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी मध्यरात्री १ च्या सुमारास उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात एक फोन आला. यावेळी गणेश सर्जेराव मोरे हे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. त्यांनी तो फोन उचलला. यानंतर समोरच्या व्यक्तीने मी दिल्लीवरुन बोलतोय असे सांगितले. आम्ही कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला आहे. आता लगेचच आम्ही कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी फोनवरुन दिली. यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मोठी धावपळ सुरु झाली.

त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी ही माहिती ठाणे कंट्रोल रूम आणि कल्याण रेल्वे पोलिसांना दिली. कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वाडच्या माध्यमातून पूर्ण रेल्वे स्थानक पिंजून काढले. तब्बल तीन ते चार तास कल्याण स्थानकात सर्च ऑपरेशन करण्यात आहे. मात्र त्यानंतर फोनवरुन बॉम्बची अफवा देण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

पोलिसांना सतर्क राहण्याची सूचना

या प्रकरणाचा तपास सुरू असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. अशा धोकादायक अफवांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या कल्याण रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही या आलेल्या कॉलचा तपास करत आहोत. यानंतर आता पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.