AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महत्त्वाची कामे नकोच… सहा दिवस मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट राहणार बंद, पर्याय काय?

मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट रस्ते दुरुस्तीसाठी 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीत सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत बंद राहील. वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येईल. अवजड वाहनांना पूर्ण बंदी आहे. प्रवाशांनी प्रवास आखणी करावी. मदतीसाठी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन टीम उपलब्ध असतील.

महत्त्वाची कामे नकोच... सहा दिवस मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट राहणार बंद, पर्याय काय?
पुढील सहा दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीत महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद असेल
| Updated on: Feb 24, 2025 | 9:41 AM
Share

महत्त्वाच्या कामासाठी कसारा घाटातून जाणार असाल तर ही बातमी ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई-नाशिक महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून येत्या सहा दिवसात या मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला थोड्याशा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील सहा दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीत महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दोन टप्प्यात पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. सोमवार, 24 फेब्रुवारी ते गुरुवार, 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तसेच 3 मार्च ते 6 मार्च या दरम्यान जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार आहे. या दरम्यान नाशिकच्या दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक-मुंबई मार्गिके वरील नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रासाला समोरे जावे लागणार आहे.

अवजड वाहनांना सहा दिवस पूर्णपणे बंदी

दरम्यान, जुना कसारा घाट दुरुस्ती दरम्यान बंद असणार असल्याने लहान वाहनाची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. जव्हार, मोखाडा या दिशेने येणारी वाहतूक घाटणदेवी मंदिर मार्गे नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. परंतु, या दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ओडिसी सारखी अवजड वाहने मुंबई, पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गे वळविण्यात येणार आहेत. या दिशेने प्रवास करणार असाल तर वाहनचालक, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती आणि त्यामुळे वळविण्यात येणारी मार्ग लक्षात घेता मुंबई – नाशिक – शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात कार्यरत राहणार आहे. नवीन कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी आणि मदत केंद्र उभारली जाणार आहेत.

जुन्या कसारा घाटातील डोकावणाऱ्या दरडी, जुनी महाकाय वृक्ष देखील या कालावधीत काढली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात म्हणजेच पावसाळ्यात यांचा त्रास होणार नाही, अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन सदस्यांकडून करण्यात येत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.