महावितरणनं सूचना न देता वीज कनेक्शन तोडलं, 4 गावातील ग्रामस्थांचा थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूरमध्ये वीज तोडणी मोहीम महावितरणनं हाती घेतली आहे. महावितरणनं शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता वीज तोडल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महावितरणनं सूचना न देता वीज कनेक्शन तोडलं, 4 गावातील ग्रामस्थांचा थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचं आत्मदहन आंदोलनImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 4:41 PM

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) वीज तोडणी मोहीम महावितरणनं हाती घेतली आहे. महावितरणनं (Mahavitran) शेतकऱ्यांना (Farmers) कोणतीही नोटीस न देता वीज तोडल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा, बीड, वाशी गावातील विजेचे कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेतले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील पाणीपुरवठाची वीज खंडित केल्याने गावकरी आक्रमक होत महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले.

चार गावातील ग्रामस्थ आक्रमक

महावितरणनं कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ झाले होते. कोणतिही पूर्वसूचना न देता वीज कापल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते. महे, कसबा, बीड आणि वाशी गावातील ग्रामस्थ महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर, महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील धारेवर धरलं.

कोल्हापूरमधील काही भागात वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. महावितरणच्या या मोहिमेविरोधात ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत.  वीज कनेक्शन तोडायचं म्हणलं तर रितसर नोटीस द्यावी लागते. मात्र, सध्या महावितरणकडून सुरु असलेला प्रकार चुकीचा असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

महावितरणचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात खडाजंगी

गावातील विजेचे कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. यावेळी महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

इतर बातम्या: 

बारावीच्या केमिस्ट्रीचा पेपर फुटीचा प्रकार नाही , तर कॉपीचा प्रकार- बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी

दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस, जालन्यात नाभिक समाज आक्रमक, काय आहे मागणी?

Kolhapur farmers reach to Mahadiscom office due to cut electricity without any information

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.