AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरणनं सूचना न देता वीज कनेक्शन तोडलं, 4 गावातील ग्रामस्थांचा थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूरमध्ये वीज तोडणी मोहीम महावितरणनं हाती घेतली आहे. महावितरणनं शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता वीज तोडल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महावितरणनं सूचना न देता वीज कनेक्शन तोडलं, 4 गावातील ग्रामस्थांचा थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचं आत्मदहन आंदोलनImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 4:41 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) वीज तोडणी मोहीम महावितरणनं हाती घेतली आहे. महावितरणनं (Mahavitran) शेतकऱ्यांना (Farmers) कोणतीही नोटीस न देता वीज तोडल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा, बीड, वाशी गावातील विजेचे कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेतले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील पाणीपुरवठाची वीज खंडित केल्याने गावकरी आक्रमक होत महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले.

चार गावातील ग्रामस्थ आक्रमक

महावितरणनं कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ झाले होते. कोणतिही पूर्वसूचना न देता वीज कापल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते. महे, कसबा, बीड आणि वाशी गावातील ग्रामस्थ महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर, महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील धारेवर धरलं.

कोल्हापूरमधील काही भागात वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. महावितरणच्या या मोहिमेविरोधात ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत.  वीज कनेक्शन तोडायचं म्हणलं तर रितसर नोटीस द्यावी लागते. मात्र, सध्या महावितरणकडून सुरु असलेला प्रकार चुकीचा असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

महावितरणचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात खडाजंगी

गावातील विजेचे कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. यावेळी महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

इतर बातम्या: 

बारावीच्या केमिस्ट्रीचा पेपर फुटीचा प्रकार नाही , तर कॉपीचा प्रकार- बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी

दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस, जालन्यात नाभिक समाज आक्रमक, काय आहे मागणी?

Kolhapur farmers reach to Mahadiscom office due to cut electricity without any information

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.