AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस, जालन्यात नाभिक समाज आक्रमक, काय आहे मागणी?

नाभिक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी आज जालन्यात दानवे यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. दानवे यांनी संपूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात उग्र आंदोलन उभारु असा इशारा त्यांनी दिला.

दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस, जालन्यात नाभिक समाज आक्रमक, काय आहे मागणी?
जालन्यात रावसाहेब दानवेंविरोधात आंदोलनImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 4:12 PM
Share

जालनाः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची (Raodsaheb Danve) अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका करताना रावसाहेब दानवे यांनी या सरकारची अवस्था तिरुपती येथील न्हाव्यांसारखी झाल्याचं सांगत, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे मारून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसे आघाडी सरकार करतेय, अशी टीका केली होती. दाववेंच्या या वक्तव्याचा नाभिक समाजाने तीव्र निषेध केला असून त्यांनी संपूर्ण नाभिक समाजाची (Nabhik Samaj) माफी मागावी, अशी भूमिका नाभिक समाजाने घेतली आहे. आज जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा पुन्हा एकदा जोरदार निषेध करण्यात आला. तसेच त्यांचीही अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे आवाहन नाभिक समाजाचे नेते कल्याण दळे यांनी केले.

कुठे, कधी केलं होतं आक्षेपार्ह विधान?

नाभिक समाजाला अपमानास्पद वाटेल, असं वक्तव्य करणं रावसाहेब दानवे यांना चांगलंच भोवणार असं दिसतंय. जालन्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय मिळणार?’ या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात दानवे यांनी तीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच कामं केली नसून फक्त काही लाखांच्या निधीवरच रस्त्यांची बोळवण सुरु असल्याचं म्हटलं. हे बोलतानाच त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची तुलना तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांशी केली होती. ते म्हणाले होते, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसं आघाडी सरकारचं सुरु आहे. विकासकामांना तुटपुंजा निधी देत महाविकास आघाडी सरकारनं लटकत ठेवलं आहे, असं दानवे म्हणाले होते. दानवेंच्या याच वक्तव्यामुळे नाभिक समाज आक्रमक झाला आहे.

काय म्हणतात नाभिक समाजाचे नेते?

नाभिक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी आज जालन्यात दानवे यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. दानवे यांनी संपूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात उग्र आंदोलन उभारु असा इशारा त्यांनी दिला. जालन्यातील मामा चौकात नाभिक समाजाच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आले. तसेच दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

इतर बातम्या-

नेमकं कुठे बिनसलं? आमिरने सांगितलं रिना, किरण रावसोबतच्या घटस्फोटांमागील कारण

IPL 2022: नरिमन पॉईंट ते अंधेरी, मुंबईच्या कुठल्या हॉटेलमध्ये IPLची कुठली टीम उतरणार, काय सुविधा मिळणार?

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.