kolhapur north assembly bypoll: महाविकास आघाडीचे नेते डबल ढोलकी, गावांच्या हद्द वाढीवरून चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका

kolhapur north assembly bypoll: कोल्हापुरातील (kolhapur) गावांच्या हद्द वाढीच्या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi) नेत्यांवर जोरदार टीका केली.

kolhapur north assembly bypoll: महाविकास आघाडीचे नेते डबल ढोलकी, गावांच्या हद्द वाढीवरून चंद्रकांत पाटलांची जोरदार टीका
गावांच्या हद्द वाढीवरून चंद्रकांत पाटलांची जोरदार टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 1:07 PM

कोल्हापूर: कोल्हापुरातील (kolhapur) गावांच्या हद्द वाढीच्या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi) नेत्यांवर जोरदार टीका केली. तुम्ही कोल्हापूर शहरात आला तर विकास निधी वाढेल. त्याचा गावांच्या विकासासाठी फायदा होईल, असं आम्ही गेल्या पाच वर्षात या गावांना अनेकदा सांगितलं. परंतु, या गावांनी ऐकलं नाही. या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची नेहमी डबल ढोलकी चालते. जिल्हा परिषदेची निवडणूक आली की शहरात येणार नाही म्हणून सांगतात आणि पालिकेची निवडणूक आली की हद्द वाढीची मागणी करतात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. हरण्याची स्थिती आल्याने रोज नवी घोषणा चालली आहे. पाच गावांची हद्द वाढ कराच. बघा येतात की नाही अंगावर. हिंमत असेल तर पाच गावांच्या हद्द वाढीची घोषणा कराच, असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला केलं. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आव्हान दिलं आहे.

हद्द वाढ करण्यास गावांचा विरोध असल्याने शेवटी देवेंद्र फडणवीसांनी कंटाळून प्राधिकरण दिलं. कधी तरी ही गावं शहरात येतील, तसेच या प्राधिकरणातून गावांचा विकास होईल या हेतूने फडणवीसांनी प्राधिकरण दिलं होतं. पण दोन वर्षात प्राधिकरणची वाट लावण्यात आली आहे. हद्द वाढही नाही आणि प्राधिकरणाचं काम नाही. हद्दवाढ आजूबाजूच्या गावाला कन्व्हिन्स केल्याशिवाय होत नाही. भाजपच्या जागा 80च्या खाली भाजप जात नसल्याचा रिपोर्ट आहे. त्यामुळे अजितदादांनी पुण्यात आजूबाजूची गावं वाढवली. तरीही भाजपच्याच जागा वाढणार म्हणून रिपोर्ट आला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

सत्यजीत कदम दिल्लीत जातील

यावेळी त्यांनी कोल्हापुरातील रेल्वेच्या प्रश्नावरही भाष्य केलं. सत्यजित कदम निवडून आल्यावर ते आधी दिल्लीला जातील. घराघरातील सत्कार घेत बसणार नाही. ते दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन देतील. आम्ही त्यांना दिल्लीत ऑफिस आणि स्टाफ देऊ. ते रेल्वेचा प्रश्न मार्गी लावतील, असं पाटील म्हणाले.

16 एप्रिल रोजी निकाल

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा जोरात प्रचार सुरू आहे. ही जागा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. येत्या 12 एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 एप्रिल रोजी कोल्हापूर उत्तर विधानसभेचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार?

Nitesh Rane: नितेश राणेंचा 5 लाखांचा गुड बिहेवियर बाँड भरण्यास नकार; नेमकं कारण काय?

Vasant More: मुख्यमंत्र्यांची वसंत मोरेंना खुली ऑफर, मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही, राज ‘जप’ करणारे मोरे जाणार?

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.