AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad | उस्मानाबादच्या धाराशिव लेणीजवळ सापडले 2 जाते; प्राचीन वसाहत असण्याची शक्यता

जात्याचा उपयोग दळण दळण्यासाठी केला जातो. असे दोन जाते धाराशिव लेणीजवळ सापडलेत. त्यामुळं या परिसरात प्राचीन वसाहत असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Osmanabad | उस्मानाबादच्या धाराशिव लेणीजवळ सापडले 2 जाते; प्राचीन वसाहत असण्याची शक्यता
धाराशिव लेण्यांचे संग्रहित छायाचित्र.
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 16, 2022 | 11:07 AM
Share

उस्मानाबाद : जिल्ह्याला प्राचीन असा वारसा लाभला आहे. उस्मानाबादपासून (Osmanabad) पश्चिमेला 5 किमी अंतरावर बालाघाट डोंगर रांगेत इ. स. सहावे ते आठव्या शतकातील उत्तर वाकाटक काळातील लेणी आहेत. हा सात लेणींचा लेणी (Leni) समूह आहे. येथील लेणी क्रमांक दोन ( पार्श्वनाथ भगवान ) मुख्य अशा लेणीजवळ पाण्याचे कुंड आहे. येथे इतिहास व पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे यांना संशोधन करत असता त्यांना प्राचीन काळातील दोन जाते सापडले. लेणीमध्ये वास्तव्य करणारे साधक अथवा भिकू हे भिक्षा मागून उदर निर्वाह करत असत. काही अनुयायांनी व धर्म दीक्षा देणाऱ्या लोकांनी दिलेली मदत व धान्य हे दळण्यासाठी या जात्यांचा उपयोग होत असावा.

पाण्याच्या कुंडाजवळ सापडले जाते

पाण्याच्या कुंडाजवळ हे जाते मिळाले. त्यामुळं या ठिकाणी अन्न बनवण्याची जागा असावी. जात्याचे लहान मोठे आकार यावर आपण असे सांगू शकतो की, व्यक्तिगत अन्न बनविले जात असावे. काही वेळा सामूहिक अन्न दळले जात असावे. याच भागात एखादी प्राचीन वसाहती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरातत्व खाते यांनी या ठिकाणी उत्खनन करावे, अशी मागणी जयराज खोचरे यांनी केली. उत्खनन केल्यास जमिनीच्या पोटात काय आहे, ते दिसेल. यावरून या भागात प्राचिन वसाहत होती का याची खात्री होईल.

धाराशिव लेण्यांचा प्राचीन इतिहास

धाराशिव लेण्यांचा उल्लेख प्राचीन जैन साहित्यात येतो. 11 व्या शतकातील जैन मुनी कनकामर यांच्या करकण्डचरयु या प्राकृत ग्रंथात लेण्यांबद्दलचा उल्लेख आहे. या ग्रंथानुसार करकंड नावाच्या राजाचा मुक्काम तेरापूरच्या दक्षिणेस असलेल्या अरण्यात पडला होता. तेव्हा तेरापूरच्या शिव नावाच्या राजाने त्याची भेट घेतली. जवळच असलेल्या लेण्यांसंबंधी माहिती सांगितली. या लेण्यांमध्ये अनेक स्तंभ आहेत. त्यात पार्श्वनाथाच्या मूर्तीची करंडक राजाने पूजा केली. त्याचबरोबर या लेण्यांचा त्याने जीर्णोद्धार केला. तेथील डोंगर माथ्यावर त्याला वारुळात असलेली एक पार्श्वनाथाची मूर्ती सापडली होती.

इतर बातम्या :

भाजपच्या गद्दारीमुळं 2019 ला पराभव, शिवसेना नेत्याचं टीकास्त्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा

Aurangabad: शहरात सध्या एकच चर्चा, औरंगाबादला कोणतं गिफ्ट मिळणार? डॉ. भागवत कराडांच्या ट्विटचा अर्थ काय?

Republic Day | पथसंचलन पाहण्यासाठी फक्त 24 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था, प्रजासत्ताक दिनी यंत्रणा अलर्टवर

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली