AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला चालले होते, पण चालकाचा कारवरील ताबा सुटला अन्…

मुलीच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी चाकूर शहरातील कुटुंब कर्नाटकात चालले होते. मात्र मुलीच्या सासरी पोहचण्याआधीच कुटुंबावर काळाने झडप घातली.

मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला चालले होते, पण चालकाचा कारवरील ताबा सुटला अन्...
लातूरमध्ये कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघातImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 25, 2023 | 6:42 PM
Share

लातूर / महेंद्र जोंधळे : काळीज पिळवटून टाकणारी एक घटना लातूर जिल्ह्यातल्या निलंगा शहराजवळ घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चाकूर शहरातील मुलीचे कर्नाटकातल्या बसवकल्याणमधील तरुणासोबत लग्न ठरले होते. या लग्नाची बोलणी करायला कुटुंबीय चालले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. भरधाव कारवरी चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना निलंगा शहराजवळ घडली आहे. कारमधील अन्य दोन जण जखमी असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलीच्या लग्नाची तारीख ठरवायला चालले होते कुटुंबीय

चाकूर शहरातील रहिवासी असलेल्या या कुटुंबातील मुलीचे लग्न ठरले आहे. लग्नाची तारीख ठरवण्यासाठी कुटुंबातील सहा जण आपल्या कारने कर्नाटकातल्या बसवकल्याणकडे निघाले होते. यादरम्यान निलंगा शहरापासून दोन किमी अंतरावर निलंगा-औराद शहाजनी रस्त्यावर चालकाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे कार भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटली.

कारमधील चौघांचा जागीच मृत्यू

या अपघातात गंभीर जखमी होऊन कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले. या घटनेमुळे चाकूर शहरावर शोककळा पसरली आहे. मुलीच्या लग्नाचा आनंद साजरा करण्याआधीच कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विरारमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत कुटुंबाचा मृत्यू

दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडून जात असताना ट्रेनने धडक दिल्याने पती-पत्नीसह तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. सदर कुटुंब सूरतहून विरारला आले आणि विरारहून वसईत आपल्या घरी जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडून चालले होते. मात्र घरी पोहचण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार