AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला 30 वर्षे पूर्ण; हजारो लोकांनी जीव गमावला, 1993 साली काय घडलं? वाचा…

Latur Killari Earthquake : महाराष्ट्राच्या इतिहासातील भळभळती जखम... लोक साखरझोपेत असताना भूकंप झाला अन् हजारो लोकांनी जीव गमावला... हजारो जनावरं दगावली. 1993 साली लातूरमध्ये काय घडलं? आज या दुर्घटनेला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. वाचा सविस्तर...

Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला 30 वर्षे पूर्ण; हजारो लोकांनी जीव गमावला, 1993 साली काय घडलं? वाचा...
Image Credit source: File
| Updated on: Sep 30, 2023 | 11:02 AM
Share

किल्लारी, लातूर | 30 सप्टेंबर 2023 : किल्लारी… महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एक गाव. दिवस होता 30 सप्टेंबर 1993 चा. गणपती विसर्जनाचा हा दिवस… गणपती विरर्जन झाल्यानंतर हे गाव गाढ झोपी गेलं होतं. अख्खं गाव साखर झोपेत असताना पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवायला लागले. पुढे काहीच वेळात होत्याचं नव्हतं झालं. घरंच्या घरं जमीनदोस्त झाली. हजारो लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. हजारो लोकांनी आपला जीव गमावला. हजारो जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेचा उल्लेख आला की आजही अंगावर शहारा उभा राहतो.

अन् सारं सारं गमावलं…

लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 मोठा भूकंप झाला. या भूकंपाचं केंद्र होतं, सोलापूरच्या ईशान्येला 70 किमी अंतरावरचं किल्लारी गाव. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले. 6. 4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता.  या भूकंपात 7 हजार 928 लोकांनी आपला जीव गमावला. 16 हजार लोक जखमी झाले. तर 15 हजार 854 जनावरं मृत्यूमुखी पडली. हा भूकंप केवळ किल्लारी पुरता मर्यादित नव्हता. तर लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावांवर त्याचा प्रभाव पडला.  30 घरं जमीनदोस्त झाली. तर 13 जिल्ह्यातील 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. लोकांनी आपलं अन् सारं सारं गमावलं.

लोकांचा टाहो…

एवढा मोठा भूकंप झाल्यानंतर आणि आप्तेष्टांना गमावल्यानंतर स्थानिकांनी टाहो फोडणं सहाजिक होतं. किल्लारीसह आजूबाजूच्या परिसरात लोकांच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या आप्तेष्टांना लोक शोधत होते. अचानकपणे कोसळलेला दु:खचा डोंगर लातूरवासीयांसह अवघा महाराष्ट्र दु:खात बुडाला.

महाराष्ट्र दु:खात असताना देशातून आणि परदेशातूनही मदत आली. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांची महत्वाची भूमिका राहिली. लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं. आज या भूकंपाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रावर आघात करणाऱ्या भूकंपाची जखम आजही भळभळती आहे. आजही या भूकंपाची उल्लेख आला की, अंगावर शहारा येतो. आजही किल्लारीच्या नागरिकांना गहिवरून येतं.

Follow Us
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.
सर्वांना सुखरुप भारतात आणणार! शिंदेंनी दिलं आश्वासन
सर्वांना सुखरुप भारतात आणणार! शिंदेंनी दिलं आश्वासन.
दुबईत अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले!
दुबईत अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले!.