AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेलमध्ये जाण्यासाठी अजिबात घाबरू नका, प्रकाश आंबेडकरांनी सर्व राजकीय पक्षांना का केलं आवाहन? कोर्टाच्या आदेशावरचं मोठं विधान काय?

Prakash Ambedkar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पुढे ढकलण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केले आहे.

जेलमध्ये जाण्यासाठी अजिबात घाबरू नका, प्रकाश आंबेडकरांनी सर्व राजकीय पक्षांना का केलं आवाहन? कोर्टाच्या आदेशावरचं मोठं विधान काय?
Prakash AmbedkarImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 03, 2025 | 4:40 PM
Share

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आज जाहीर होणार निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणर आहे. मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता 20 डिसेंबर पर्यंत आचारसंहितेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. अशातच आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

नागपूर खंडपीठाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा – आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, ‘नगर परिषद निवडणुकीसंबंधीचा नागपूर खंडपीठाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. अशा प्रकारे निकाल पुढे ढकलता येतात का? संविधानानुसार निवडणूक प्रक्रियेत कोणत्याच कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे गेल्याच आठवड्यात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला तरीही नागपूर खंडपीठाने हा निर्णय कसा काय दिला? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

प्रकाश आंबेडकरांचा सवाल

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, फक्त चिन्ह वाटपाबाबत जिल्हा स्तरावरच्या कोर्टाला सुनावणी घेता येतो, हाईकोर्टाला तो अधिकार नाही. निवडणूक आयोगाने याआधी जाहीर केलेल्या नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम अनुसार 10/12/25 पर्यंत नव निर्वाचित नगरसेवकाचं गँझेट प्रसिद्ध करणं अपेक्षित आहे. पण आता आयोगानेच आपला कार्यक्रम पुढे ढकलला, त्यामुळे या दोन्ही निवडणूक प्रक्रिया एकत्रितपणे कसं प्रसिद्ध करणार ? असाही सवाल आंबेडकर यांनी विचारला आहे.

सर्व राजकीय पक्षांना आवाहन

प्रकाश आंबेडकर यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘आता घटनात्मक पेच प्रसंग समोर उभा राहिला आहे. निवडणुकांबाबत कोर्टाचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. कोर्टाची निर्णयामुळे निवडणूक प्रक्रिया अडचणीची ठरत आहे. सर न्यायाधीश यांनी प्रकरण ताब्यात घेऊन दुरूस्ती करून थांबवलेली मतमोजणी करावी. मी सर्व राजकीय पक्षांना आव्हान करतो की जेलमध्ये जाण्यासाठी अजिबात घाबरू नका.21 तारखेच्या मतमोजणीला काहीच महत्त्व राहत नाही. निवडणूक आयोगाने स्वतः कोर्टात जावे. कोर्टाने रद्द केलेली मत मोजणी करावी.

Follow Us
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख....
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख.....