AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे, कल्याणचे तारणहार उमेदवार देऊ शकले नाही, संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिमटा

Sanjay Raut: कोणाला उमेदवारी साठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी समोर कोणताही बंडखोर, गद्दार टिकणार नाही. मुंबईच्या सर्व सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कोणी दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही.

ठाणे, कल्याणचे तारणहार उमेदवार देऊ शकले नाही, संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिमटा
संजय राऊत यांचे विधान चर्चेत
| Updated on: Apr 04, 2024 | 11:20 AM
Share

महायुतीमध्ये अजूनही सर्व जागांवर उमेदवारी जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट झाले नाही. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना घेरले आहे. कल्याण -डोंबिवलीमध्ये अहंकार, गद्दारी आणि पैशांची मस्ती चालणार नाही, आम्ही तुमचा पराभव करू, असे आव्हान संजय राऊत यांनी महायुतीला दिले आहे. तसेच ठाणे शहराचे तारणहार उमेदवार देऊ शकले नाही, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी नाही

आधी तुमची उमेदवारी जाहीर करा, कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात. जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहे, अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही. जिंकण्याची भाषा करता बच्चम जी…दिल्ली अभी दूर है… आता तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही. आमची सामान्य कार्यकर्ता वैशाली दरेकर तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आगे आगे देखो होता है क्या…

ज्यांची उमेदवारी कापण्यात आली, त्यांना प्रश्न विचारा. नाशिक, रामटेक, हिंगोली, यवतमाळ, वाशिम अजून ठाणे ,कल्याण -डोंबिवलीमध्ये उमेदवार देऊ शकले नाही, जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ते आपल्या भागाचे उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही. स्वतः मुख्यमंत्री भाजपच्या दहशतीखाली आहेत. म्हणून ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात, आगे आगे देखो होता है क्या…असे चिमचे संजय राऊत यांनी महायुतीवर काढले.

कोणाला उमेदवारी साठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी समोर कोणताही बंडखोर, गद्दार टिकणार नाही. मुंबईच्या सर्व सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कोणी दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही. संजय निरुपमसंदर्भात निर्णय हा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे त्यावर इतर पक्षाने बोलणं उचित नाही. पक्षाविरोधात जर कोणी वेगळी भूमिका घेतली तर प्रत्येक पक्षाकडून अशा प्रकारची कारवाई केली जाते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.