AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् वीज बिलात…”, एकनाथ शिंदेंच्या 10 महत्त्वाच्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, रोजगार निर्मिती आणि वृद्धांना पेन्शन वाढ यासारख्या प्रमुख घोषणा करण्यात आल्या.

लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् वीज बिलात..., एकनाथ शिंदेंच्या 10 महत्त्वाच्या घोषणा
| Updated on: Nov 06, 2024 | 10:48 AM
Share

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या दोन आठवड्यांनी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारतोफांचा झंझावात सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. आता नुकतंच महायुतीची एक प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजनेसह रोजगाराबद्दलही मोठी घोषणा करण्यात आली आहे.

महायुतीच्या प्रचाराची पहिली प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यापूर्वी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांसह महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 कलमी कार्यक्रम सादर करत प्रचाराचे रणशिंग फुंकले.

एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा

१) राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही २१०० रुपये, पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती. २) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये. ३) प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी. ४) वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपयांची मदत. ५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार. ६) राज्यातील तरुणांना २५ लाख रोजगार देणार. ७) ४५ हजार पांदण रस्ते बांधणार. ८) अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना १५ हजार रुपये वेतन. ९) वीज बिलात ३० टक्के कपात. १०) शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार.

पंचगंगेच्या महापुरावर तोडगा काढण्यासाठी योजना

या १० कलमी कार्यक्रमासह एकनाथ शिंदेंनी पंचगंगेच्या महापुरावर तोडगा काढण्यासाठीची नवीन योजनाही जाहीर केली. “कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार येणाऱ्या पंचगंगेच्या महापूरावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ३२०० कोटींची योजना सरकारने आणली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. येत्या २३ तारखेला छोट्या मोठ्या लवंग्यांऐवजी अँटम बॉम्ब फोडायचा आहे”, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.

यावेळी एकनाथ शिंदेंनी आमचे सरकार विकास करणारे सरकार आहे, असेही सांगितले. “डबल इंजिनचे सरकार हे विकास करणारे सरकार असून राज्याचा विकास करायचा असेल तर राज्यात समविचारी सरकार असायला हवे”, असे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले. “आमच्यावर दिल्लीत जातो म्हणून टीका होते, मात्र राज्यातील अनेक योजनांसाठी निधी आणण्यासाठी आम्ही दिल्लीला जातो”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच