
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंर्भात महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली आहे. येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
राज्यात निवडणुकीसाठी पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये 246 नगर परिषदेमध्ये दहा नव्या नगर परिषदांचा समावेश आहे तर 42 नगर पंचायतींमध्ये 15 नव्या नगर पंचायतींचा समावेश आहे. एकूण 6 हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे.
महत्वाच्या तारखा
* नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात- 10 नोव्हेंबर 2025
* नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत- 17 नोव्हेंबर 2025
* नामनिर्देशन पत्राची छाननी- 18 नोव्हेंबर 2025
* अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्रावर माघारीची अंतिम मुदत- 21 नोव्हेंबर 2025
* अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र अंतिम मुदत- 25 नोव्हेंबर 2025
* मतदानाचा दिवस- 02 डिसेंबर 2025
* मतमोजणीचा दिवस- 03 डिसेंबर 2025
एकूण मतदार व मतदान केंद्र
* पुरुष मतदार- 53,79,931
* महिला मतदार- 53,22,870
* इतर मतदार- 775
* एकूण मतदार- 1,07,03,576
* एकूण मतदान केंद्र- सुमारे 13,355
एकूण जागा आणि आरक्षित जागा
* निवडणूक होत असलेल्या नगर परिषदा- 246
* निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती- 42
* एकूण प्रभाग- 3,820
* एकूण जागा- 6,859
* महिलांसाठी जागा- 3,492
* अनुसूचित जातींसाठी जागा- 895
* अनुसूचित जमातींसाठी जागा- 338
* नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 1,821
नगरपररषद/ नगरपंचायतींची जिल्हा व विभागनिहाय संख्या
पालघर- 4
रायगड- 10
रत्नागिरी- 7
सिंधुदुर्ग- 4
ठाणे- 2
कोकण विभाग एकूण- 27
अहिल्या नगर- 12
धुळे- 4
जळगाव- 18
नंदूरबार- 4
नाशिक- 11
नाशिक विभाग एकूण- 49
कोल्हापूर- 13
पुणे- 17
सांगली- 8
सातारा- 10
सोलापूर- 12
पुणे विभाग एकूण- 60
छत्रपती संभाजीनगर- 7
बीड- 6
धाराशिव- 8
हिंगोली- 3
जालना- 3
लातूर- 5
नांदेड- 13
परभणी- 7
छत्रपती संभाजीनगर एकूण- 52
अमरावती- 12
अकोला- 6
बुलढाणा- 11
वाशीम- 5
यवतमाळ- 11
अमरावती विभाग एकूण- 45
भुंडारा- 4
चंद्रपूर- 11
गडचिरोली- 3
गोंदिया- 4
नागपूर- 27
वर्धा- 6
नागपूर विभाग एकूण- 55
दरम्यान आचार संहितेची ऑर्डर काढली आहे. मद्य आणि पैशाबाबत प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांना मार्गदर्शन केलं आहे. बँका आणि पतपेढ्याेच्या व्यवहारावर लक्ष आहे. व्हेकल आणि ट्रान्सपोर्टवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत, असंही यावेळी निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५
निवडणुका ४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारत निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आल्या.
निवडणुका २४६ नगरपरिषदा (म्युनिसिपल कौन्सिल) आणि ४२ नगरपंचायती (ग्रामपंचायत) साठी आहेत, यात १० नवीन नगरपरिषदा आणि १५ नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा या घोषणेत नाहीत.
३. एकूण किती जागा आणि वॉर्ड्ससाठी निवडणूक होणार आहे?
एकूण ३,८२० वॉर्ड्स असून ६,८५९ जागा उपलब्ध आहेत, यात २८८ अध्यक्षपदांचा समावेश आहे.
अधिसूचना आणि नामनिर्देशन अर्ज भरणे: १० ते १७ नोव्हेंबर २०२५.
नामनिर्देशन छाननी: १८ नोव्हेंबर २०२५.
माघार घेण्याची मुदत: २१ नोव्हेंबर २०२५ (अपील नसलेल्या मतदारसंघांसाठी); २५ नोव्हेंबर २०२५ (अपील असलेल्यांसाठी).
मतदान दिवस: २ डिसेंबर २०२५.
मतमोजणी दिवस: ३ डिसेंबर २०२५.
एकूण मतदार १,०७,०३,५७६ आहेत – पुरुष: ५३,७९,९३१, महिला: ५३,२२,८७०, इतर: ७७५. सुमारे १३,३५५ मतदान केंद्रे उभी केली जातील.
सर्व निवडणुका पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) द्वारे होतील.
हो:महिला: ३,४९२ जागा.
अनुसूचित जाती: ८९५ जागा.
अनुसूचित जमाती: ३३८ जागा.
मागासवर्गीय: १,८२१ जागा.
कोकण विभाग: २७ (पालघर: ४, रायगड: १०, रत्नागिरी: ७, सिंधुदुर्ग: ४, ठाणे: २).
नाशिक विभाग: ४९ (अहिल्यानगर: १२, धुळे: ४, जळगाव: १८, नंदुरबार: ४, नाशिक: ११).
पुणे विभाग: ६० (कोल्हापूर: १३, पुणे: १७, सांगली: ८, सातारा: १०, सोलापूर: १२).
छत्रपती संभाजीनगर विभाग: ५२ (छत्रपती संभाजीनगर: ७, बीड: ६, धाराशिव: ८, हिंगोली: ३, जालना: ३, लातूर: ५, नांदेड: १३, परभणी: ७).
अमरावती विभाग: ४५ (अमरावती: १२, अकोला: ६, बुलढाणा: ११, वाशिम: ५, यवतमाळ: ११).
नागपूर विभाग: ५५ (भंडारा: ४, चंद्रपूर: ११, गडचिरोली: ३, गोंदिया: ४, नागपूर: २७, वर्धा: ६).
विरोधी पक्ष (MVA आणि MNS) यांनी मतदार यादीतील अनियमितता, निष्काळजीपणा आणि पक्षपाताचा आरोप करून निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. भाजप नेत्यांनी “वोट जिहाद” आणि डुप्लिकेट मतदारांचा दावा केला आहे. इतर वादांमध्ये भाषा वाद आणि ठाण्यात सावरकरांशी संबंधित नाटकावर झालेला निषेध समाविष्ट आहे.१०. निवडणुकीदरम्यान कोणते नियम किंवा आचारसंहिता लागू आहे?आदर्श आचारसंहिता लागू आहे – दारू विक्री आणि रोख व्यवहारांवर बंदी. पोलिसांना मार्गदर्शक तत्त्वे मिळाली असून बँका, सहकारी संस्था, वाहने आणि वाहतूक यांचे निरीक्षण सुरू आहे जेणेकरून निष्पक्षता राहील.