AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार? आदिती तटकरेंनीच घोळ संपवला

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत मोठा बदल झाला आहे. ८ लाख महिलांना आता १५०० ऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत. हे बदल नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आहेत. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार? आदिती तटकरेंनीच घोळ संपवला
ladki bahin yojana Image Credit source: social media
| Updated on: Apr 15, 2025 | 9:45 PM
Share

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत महिलांना १५०० रुपये देण्यात येतात. आता मात्र या योजनेत मोठा ट्विस्ट आला आहे. लाडकी बहीण योजनेतील तब्बल ८ लाख महिलांना आता १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. आता या ८ लाख महिला नेमक्या कोण, त्यांना फक्त ५०० रुपयेच का दिले जाणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता यावर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सविस्तर उत्तर दिले आहे.

अदिती तटकरे यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये अदिती तटकरे यांनी राज्यातील विधानसभा अधिवेशनातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कोणत्या लाडक्या बहिणीला फक्त ५०० रुपये दिले जाणार याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

अदिती तटकरे काय म्हणाल्या?

दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.

एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे, किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे, असे अदिती तटकरेंनी म्हटले आहे.

कोणत्या लाडक्या बहि‍णींना मिळणार फक्त 500 रुपये?

  • लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही.
  • महाराष्ट्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला ६००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
  • प्रधानमंत्री सम्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाते. यानंतर महाराष्ट्र शासनाद्वारे नमो शेतकरी योजना राबवण्यात येत आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून वार्षिक ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. तर केंद्र शासनाद्वारे ६००० म्हणजेच एकूण १२००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.
  • यानुसार सध्या ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना दर महिना १००० रुपये दिले जात आहेत.
  • त्यामुळे आता ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेचे १५०० रुयपांऐवजी फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली