
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारांच्या तोफा शांत झाल्या असून राज्यात आचारसहिंता लागू झाली. उद्या राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागेल. प्रशासनाकडून जोरदार तयारी मतदानाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त मतदान केंद्राबाहेर राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सभांचा धडाका बघायला मिळाला होता. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या..
सांगलीमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. प्रभाग 10 मधील वडर कॉलनीत भाजपा कार्यकर्ते शेखर कलगुटगी यांच्या घरावर रात्री अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे कलगुटगी यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या. दगडफेकोच्या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल पाटणकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर आरोप केले आहेत. तुकाराम काते यांनी फेटाळलेले आरोप सगळे खोटे असून त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, अशी मागणी अनिल पाटणकर यांनी केली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराची तोफ थंडावली आहे. अशात कल्याणमध्ये एआयचा गैरवापर करुन उमेदवाराची बदनामी करणारे फेक व्हीडिओ तयार करुन व्हायरल केले जात आहेत. कल्याण पश्चिमेतील उबाठा गटाच्या उमेदवारावर एआयच्या मदतीने हत्या-खंडणीचे खोटे आरोप करणारे व्हीडिओ व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे संबंधितांविरोधात सायबर , निवडणूक अधिकारी आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. मतदानाला काही तास बाकी आहे. मात्र त्यानंतरही कल्याण डोंबिवली महानगपालिकेत राष्ट्रवादी पवार गटातील गोंधळ संपण्याचं नाव घेत नाहीय. पॅनल क्रमांक 4 ड मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अधिकृत उमेदवार आहे. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांचा उबाठाच्या उमेदवाराला पाठिंबा आहे. त्यामुळे उमेदवारासह मतदारांमध्ये संभ्रमांचं वातावरण आहे.
विरारच्या बरफ पाडा येथे खदानीत दोन जण बुडाले
आज सकाळी पतंग उडवून झाल्यानंतर दुपारी खदानीत पोहण्यासाठी गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने दोन जण बुडाले
विनायक शितप आणि ईकांशा शितप असे बुडलेल्यांची नाव
वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल
शोध मोहीम सुरू
नागपूर महापालिका निवडणूक मतदानासाठी मतदान केंद्र झाली सज्ज
नागपुरात 3004 मतदान केंद्रांवर होणार मतदान, त्यात काही संवेदनशील बूथचा समावेश
प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी
उद्या सकाळी 7.30 वाजेपासून होणार मतदानाला सुरवात
नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना मनसे, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा
मुकेश शहाणे यांचा ab फॉर्म झाला होता अवैध
मुकेश शहाणे यांच्या विरोधात आहे सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर
मतदान प्रक्रियेसाठी अवघे काही तास बाकी असताना प्रभाग ३९ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे, शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला पाठिंबा
कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
मतदान यंत्रणा अलर्ट मोडवर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण 122 प्रभागासाठी 31 पॅनल
14,25,086 इतकी मतदारांची संख्या पैकी 7,45,664 पुरुष मतदार तर 6,78,870 स्त्री मतदार
1548 मतदान केंद्रांची उभारणी
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातील विशेष एनआयए कोर्टाने 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील पाच आरोपींना तीन दिवसांसाठी एनआयए कोठडी सुनावली आहे . स्फोटातील आरोपी डॉ. शाहीन, इरफान, जसीर बिलाल वाणी, अदील आणि मुझम्मिल यांना डिसेंबरमध्ये अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीता अडचण आल्यावर पाडूचा वापर केला जाईल असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं आहे. पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. आदेशानुसार पालिकेनं राजकीय पक्षांना प्रात्यक्षिक दाखवले असल्याचं स्पष्टीकरण दिलं.
वसई विरार महापालिका निवडणुकीची मतमोजणी केंद्राची पूर्ण तयारी झाली आहे. पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर ही मतमोजणी पार पडणार आहे. 9 प्रभागाचे 9 मतमोजणी केंद्र बनविले आहेत. प्रत्येक मतमोजणी केंद्राला कलर कोड देण्यात आला आहे. या मतमोजणी केंद्रातील कर्मचारी, अधिकारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी सर्वांना त्याच कलरचे आयकार्ड देण्यात येणार आहेत. 16 तारखेला सकाळी 10 वाजता एकाच वेळी 9 ही मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला सुरवात होणार आहे.
नांदेड शहरातील खबारगडे भाग 2 परिसरात बांधकाम दरम्यान कॉलमजवळचं एक घर अचानक पूर्णतः खचलं आहे…सुदैवाने ही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारण त्या वेळी घरामध्ये कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान या भागात नागडा बिल्डर यांचं नव्याने बिल्डिंग बांधकाम सुरू असून बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे….बांधकाम बाजूला दाट वस्तीचा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
भारताने इराणमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. सर्व भारतीयांना इराण सोडण्यास सांगण्यात आले आहे. भारतीयांना मदतीसाठी इराणमधील दूतावासाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हिंगणघाट नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपच्या निलेश ठोंबरे यांची निवड झाली आहे, तर स्वीकृत सदस्य म्हणून भाजपकडून शारदा पटेल, अंकुश ठाकूर, किशोर दिघे यांची निवड झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून सुधीर कोठारी यांचीही स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली आहे.
पिंपरी – चिंचवड येथील काळेवाडी फाटा परिसरातील अर्णव महेश व्यवहारे हा मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी खास पुण्यावरून काल सायंकाळी आपल्या मामाच्या घरी कोपरगावमधील लक्ष्मीनगर येथे आला होता. अर्णव आणि त्याचा मित्र ऋषिकेश वाघमारे अजून काही मित्रासोबत पतंग उडवित असताना शेजारील हाय व्होल्टेज तारेला स्पर्श लागल्याने अर्णवचा मृत्यू झाला, तर ऋषिकेश हा जखमी झाला.
लातूर महानगर पालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण 3 लाख 21 हजार मतदार उद्या आपला मतदानाचा हक्क बजवणार आहेत. 375 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. लातूर मध्ये 99 सवेंदनशील मतदान केंद्र आहेत. कर्मचाऱ्यांना आज मतदानाचे साहित्य वाटप करण्यात आले. मतदान कर्मचारी आता मतदान केंद्रावर पोहंचत आहेत.
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेपूर्वी प्रभाग 4 मधील देवपूर परिसरात एकाच संशयीताकडे मतदान याद्यांसह पाचशे हून अधिक मतदान कार्ड मिळाले आहेत. एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान कार्ड पकडली. यामध्ये मृत असलेल्या मतदारांचे देखील मतदान कार्ड असल्याचे उघडकीस आले आहे.
लासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन प्रभाग क्रमांक १८ मधे बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांत राडा झाला आहे. पैसे वाटपाच्या संशयावरून मध्यरात्री दो च्या सुमारास दोन्ही कार्यकर्ते आपापसात भिडलयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना युती तुटली असली, तरी आता जिल्हापरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा सन्मानजनक युतीची भाषा करताना दिसत आहे.
बदलापुरातील भाजपमधल्या स्वीकृत नगरसेवक पदांचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. स्वीकृत नगरसेवक पदांची यादी जाहीर करताना नियमानुसार आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा आरोप माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते राम पातकर यांनी केलाय. स्वीकृत नगरसेवक पद देताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार एक समिती स्थापन करून विचार विनिमय करणं आवश्यक होतं. मात्र अशी कुठलीही चर्चा न करता परस्पर स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्यामुळे राम पातकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांचा मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी राहणार त्रिस्तरीय बंदोबस्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा, गोपनीय बंदोबस्त, आणि पोलीस अधिकारी, अंमलदारांसह विविध पथक उपस्थित राहणार आहे.
नालासोपारा पूर्व प्रभाग 15 मधील भाजप उमेदवारच्या निवडणूक प्रचार कार्यालयात पैसे वाटप होत असल्याच्या आरोपाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नालासोपारा पूर्व अलकापुरी परिसरातील हा व्हिडीओ असून, मध्यरात्री दीड च्या सुमारास सोसायटी अध्यक्ष सचिव यांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप आहे.
ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते EVM मशीनचा डेमो घेऊन घरोघरी प्रचार करत असतांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. पैसे वाटप करत असल्याचा केला आरोप.
ठाकरे बंधु सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे उपस्थित. उद्या मुंबई महापालिकेसाठी आहे मतदान.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना आज ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य वाटप करण्यात आलं. MIDC मधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याच वाटप करण्यात आलं. जळगावात महापालिकेच्या 19 प्रभागातील 75 जागांसाठी 15 तारखेला मतदान पार पडत असून त्यासाठी आज मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. 3000 पेक्षा जास्त कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले असून या सर्वांना आज मतदान साहित्याचे वाटप करण्यात आल.
डोंबिवलीत पैसे वाटप, मारहाण, अटक आणि गोंधळप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आरोपी कायद्याच्या पळवाटा शोधत गोंधळ घालत आहेत. गुंड प्रवृत्तीला कायदा वेगळा नसतो, पोलिस कारवाई योग्यच आहे. KDMC मध्ये महायुतीची सत्ता निश्चित येईल. प्रभाग 29 मध्ये भाजपच्या चारही जागा जिंकणार आहोत. 122 पैकी 118–119 जागा महायुतीला मिळणार, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी दिली.
अविनाश जाधव यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधातली याचिका कोर्टाने फेटाळली आहे. सुनावणीदरम्यान हायकोर्टानं वकील सरोदेंना सुनावलं. सरोदेंना सुनावत हायकोर्टाने दंडही ठोठावला आहे.
“निवडणुकीच्या तोंडावर रोजच्या रोज कायदे बदलत आहेत. मला सगळ्यांना सांगायचं आहे की सतर्क राहा. सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांवर लक्ष ठेवा. उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटले जात आहेत. लोक नाकारतसुद्धा आहे. या सगळ्यात हरलेली गोष्ट जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला मदत करतंय, हा आमचा निश्चित आरोप आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.
पिंपरी चिंचवडमध्ये आता मतदान प्रक्रियेला वेग आलाय. निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम मशीन आणि साहित्याचं वाटप करण्यात आलंय. आठ क्षेत्रीय कार्यालयातून 2064 मतदान केंद्रासाठी 7162 ईव्हीएम मशीनचं वाटप करण्यात आलंय. हे साहित्य घेऊन कर्मचारी आणि पोलीस मतदान केंद्राकडे रवाना झालेत. शहरात 128 जागांसाठी 692 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचं भविष्य या मतपेटीत कैद होणार आहे.
“निवडणूक आयोगाने नव्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलंय की तुम्ही मतदारांना भेटू शकता, पण पत्रकं वाटू शकत नाही. मग कदाचित पैसे वाटू शकता, असं त्यांना म्हणायचं असेल. ही मुभा दिली का, हा कायदा बदलला का? नव्याने या गोष्टी का आणल्या जात नाहीत? निवडणूक त्यांना जे हवंय ते करतंय. वाघमारे उत्तर द्यायला तयार नाहीत,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.
“या सरकारला काय हवंय यासाठी निवडणूक आयोग जे काम करतंय, याच्यामध्ये काल त्यांनी नवीन नोटीफिकेशन काढलं की, मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे आज तुम्ही मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा कशी काय आली, कुठून आली याची काही कल्पना नाही. आजच कशी काय आली? जी विधानसभेला नव्हती, लोकसभेला नव्हती. ही आता कशासाठी आली,” असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरे सहकुटुंब ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेदेखील तिथे उपस्थित आहेत. ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना होणार आहेत. यावेळी रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यात संवाद झाल्याचं पहायला मिळालं.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जालना छत्रपती संभाजीनगर रोडवर नागेवाडी टोलनाक्याजवळ असलेल्या एसएसटी पथकाकडून देखील वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे 4 दिवसांपूर्वीच या ठिकाणी एसएसटी पथकाने एका कारमधून 98 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने आज हे पथक ॲक्शन मोडवर आलं असून जालना शहराकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1500 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 16 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 46 हजार 260 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 90 हजार 460 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर दीड लाखांच्या उंबरठ्यावर तर चांदीचे दर 3 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. जळगावात सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दर नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे थोड्याच वेळात मुंबादेवीचं दर्शन घेणार. उद्धव ठाकरे , राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले आहेत.
मालेगावच्या दरेगाव शिवारात MIMच्या उमेदवाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. MIMचे उमेदवार विशाल अहिरे यांच्या गाडीवर हल्ला झाला. बाईकवरून येत असताना दगडफेक केल्याचा आरोप होतोय.
बोरिवली पूर्व वॉर्ड क्रमांक १४ मध्ये मनसेने भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. काल रात्री मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, त्यानंतर पोलिस आले आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाचे अधिकारी – कर्मचारी आरामात आहेत. SST पथकाद्वारे एकाही वाहनाची तपासणी केली जात नाहीये. पैठण कडून छत्रपती संभाजीनगर शहर जाणाऱ्या नक्षत्र वाडी परिसरातील चित्र दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर SST बदकाच्या कार्यपद्धतीमुळे संशय वाढला आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी उद्या, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत शहरातील १५६३ केंद्रांवर मतदान होईल. यामध्ये १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, रिंगणात असलेल्या ७३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. प्रशासनाने मतदानासाठी ४,८६० बॅलेट युनिट्स आणि १,८०० कंट्रोल युनिट्सची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील २६६ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली असून, तिथे एसआरपी आणि विशेष पोलीस तुकड्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक तपासणी सुरू असताना, ममुराबाद नाका येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका कारमधून २९ लाख रुपयांची रोकड, ३ किलो चांदी आणि ८ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. संबंधित मुद्देमालाबाबत कोणाकडेही वैध पावत्या नसल्याने, पथकाने आणि तालुका पोलिसांनी हा सर्व ऐवज पंचनामा करून कोषागार विभागात जमा केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा मुद्देमाल बऱ्हाणपूर येथील एका सराफ पेढीच्या मालकाचा असल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे निवडणुकीच्या रिंगणात मोठी खळबळ उडाली आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून ठाणे कॉलेजसह विविध केंद्रांवरून ईव्हीएम (EVM) आणि कंट्रोल युनिट साहित्य वाटपाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे यंदा महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीनचा वापर केला जाणार नाही. निवडणूक साहित्य केंद्रांवर पोहोचवण्यासाठी पालिकेने विशेष बसेसची व्यवस्था केली असून, या संपूर्ण प्रक्रियेसाठी एसआरपी (SRP) आणि होमगार्डचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मालेगाव: निवडणुकीच्या रणधुमाळीत मालेगावातील दरेगाव शिवारात एमआयएम (MIM) उमेदवार विशाल आहिरे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास आहिरे कामानिमित्त बाहेर जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर भीषण दगडफेक केली. या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आहिरे यांनी आपली गाडी थेट पोलीस ठाण्यात नेली. हा हल्ला राजकीय विरोधकांनीच केल्याचा आरोप विशाल आहिरे यांनी केला आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सध्या या हल्लेखोरांचा शोध घेत असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
धाराशिव : देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांचे माजी पीए संतोष राऊत यांच्या पत्नी डॉ. सरोजनी राऊत आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. कळंब तालुक्यातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियावरूनही प्रचाराचा धडाका लावला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्या उमेदवारीच्या शर्यतीत होत्या. आता जिल्हा परिषदेच्या निमित्ताने त्यांनी कळंबमध्ये आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे.
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपल्यानंतरही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वसई पूर्व वॉर्ड क्रमांक १९ मधील वसई फाटा, गांगडी पाडा येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास भाजप-शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी-मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. पैसे वाटपाच्या कारणावरून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. यावेळी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबतही कार्यकर्त्यांनी हुज्जत घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदानाच्या तोंडावर झालेल्या या राड्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
शष्टीतिला एकादशी व संक्रांती निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देशी विदेशी अशा रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी ह्या समाधी मंदिरात सजावट करण्यात आलीय. माऊलींचा मुखवटा अत्यंत आकर्षक असा दिसत आहे. फुल आणि नवीन वस्त्र घालून मुखवट्याला सजावट करण्यात आलीय. सकाळपासूनच माऊलींचे हे मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अलंकापुरी नगरीत गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
पैशांचं वाटप केल्याशिवाय शिंदे सेना – भाजप जिंकू शकत नाही… पैसा कुठून येतोय, हे अजितदादांनीच सांगितलं आहे… एकमेकांना ब्लॅकमेल करुण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरु आहे… राजकारणात ब्लॅकमेलिंग सुरु आहे, गणेश नाईक दादांनी उघडपणे बोलावं… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपत असताना, मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने घोषणा केली आहे. घोषणा होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती. अखेर काल राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केली आणि इच्छुकांचा जीव भांड्यात पडला. तब्बल ८ वर्षांनी या निवडणुका होत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तिकीट मिळवण्याची स्पर्धाच लागणार आहे. यापूर्वी 2017 ला जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपुष्टात आला. कोरोनाची परिस्थिती आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे जिल्हा परिषदचा निवडणुका लांबत गेल्या. यावर्षी जिल्हा परिषद निवडणूकीत एक गट आणि दोन गणांची वाढ झाली आहे. जिल्हा परिषदच्या 63 गट व पंचायत समित्यांच्या 126 गणांसाठी आता ही निवडणूक होणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. 110 पोलिस अधिकारी, तर 2000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव बलाच्या 2 तुकड्या तर 2 दंगा नियंत्रण पथकाचा देखील समावेश आहे. मतदान प्रक्रिया निर्भीड आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांकडून ऍक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. मालेगावकरांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे मालेगाव पोलिसांकडून आवाहन केले आहे.
शिरूर तालुक्यातील आंबळे येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट्या जेरबंद असून सदर बिबट्या अंदाजे वय 1.5 वर्षे आहे. यावेळी जेरबंद बिबट्याने पिंजऱ्यात माशावर ताव मारल्याचे पाहायला मिळाले, घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी बिबट्याचा चांगला पाहुणचार करत त्याला खाण्यासाठी मासे उपलब्ध करून दिला. या घटनेमुळे परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते.
सभेतील व्हिडिओमध्ये काही तरुण आमली पदार्थ सेवन करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. महाजन यांच्या सभेत हा व्हिडिओ दाखवल्यानंतर झाला होता गोंधळ. या सभेनंतर गिरीश महाजन यांच्याशी या व्हिडिओवरून अरेरावी करत पिता पुत्राने घातला होता वाद. पोलिसांकडून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रभाग क्रमांक एकच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर हल्ला. सुदैवाने शिवाजी भालेराव या हल्ल्यात जखमी झाले नाही. दोन दुचाकीवरून तोंडाला बांधून आलेल्या चार जणांकडून हल्ला झाल्याची माहिती. राजकीय हेतू हल्ला झाल्याचा काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचा आरोप .
मतदान केंद्र हिरवळीने सजवलं… निसर्गाचा संदेश देणार मतदान केंद्र, उद्या अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागेसाठी मतदान होत आहे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.अमरावती शहरातील शांतीनिकेतन इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल येथे निसर्गाच्या सानिध्यात हिरवळीचा संदेश देणाऱ्या मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली.
शहरात ढगाळ वातावरण अन हलक्या पावसामुळे गत 24 तासांपासून थंडीने विश्रांती घेतली आहे असे वातावरण पुढील दोन दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे किमान तापमान 14 ते 19 अंशावर गेले होते शहरात गत दोन महिने थंडीची लाट होती मात्र गेल्या 24 तासापासून किमान तापमानात दुपटीने वाढ झाली आहे.
पुणे जिल्हा परिषद च्या 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गणासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
जिल्ह्यात 29 लाख 76 हजार 454 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आले आहे या सुट्टीमुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आयडीटीआर आळंदी रोड आणि दिवे कार्यालय येथील सर्व कामकाज बंद राहणार आहे ज्या नागरिकांनी 15 जानेवारी साठी वाहन परवाना किंवा वाहन नोंदणीशी संबंधित कामांची अपार्टमेंट घेतली होती त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.