Maharashtra News LIVE : सचिन आहिर यांच्या उमेदवारीनंतर शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर..
Maharashtra News LIVE Updates : भारतीय हवामान विभागाने आज अनेक भागात पावसाचा अलर्ट जारी केला आहे. राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
इगतपुरी शहरासह तालुक्यात पावसाची दमदार हजेरी
इगतपुरी शहरासह तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाची सततधार, मात्र शहर सोडून डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
-
नवी मुबंईतील मुंबई APMC फळ मार्केटमध्ये चोरीच्या प्रयत्नांची मालिका सुरूच
गेल्या चार दिवसांत तब्बल सहा गाळ्यांवर चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून, बाजारातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिघा संशयितांना रंगेहात पकडण्यात आले. संतप्त व्यापाऱ्यांनी त्यांना पकडून APMC पोलिसांच्या ताब्यात दिले आहे…सदर प्रकरणी APMC पोलीस अधिक तपास करत आहे
-
-
छत्रपती संभाजीनगरातील लिटिल फ्लॉवर शाळेत शिक्षकावर चाकू हल्ला प्रकरण
छत्रपती संभाजीनगरातील लिटिल फ्लॉवर शाळेत शिक्षकावर चाकू हल्ला प्रकरण; शाळा प्रशासनाची प्रतिक्रिया देण्यास नकार. टीसीच्या वादातून माजी विद्यार्थ्याचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात आहे. जखमी शिक्षक फ्रान्सिस दुशिंग यांच्यावर घाटी रुग्णाण्यात उपचार सुरू आहेत.
-
ट्रान्स हार्बर रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे…
नेरूळ रेल्वे स्थानक तांत्रिक बिघाड ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हर्बल लाईन रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ज्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.
-
नाशिक | संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंचायत समिती जवळ दाखल
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंचायत समिती जवळ दाखल झाली आहे. जेसीबीतून पालखीवर फुलांची उधळण करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीचे नाशिक शहरात आगमन झालं. महापौर, उपमहापौरांकडून पालखीचे स्वागत करण्यात आलं.
-
-
प्रभाग स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण विभागातील 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
प्रभाग स्तरावरील अतिक्रमणे, फेरीवाले, हातगाडीधारक तसेच अनधिकृत व्यवसायांवर होणारी कारवाई अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण व्हावी, यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रभाग समिती स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
-
ठाणे जिल्ह्यात जूनच्या पावसाची तूट 76% टक्के…
यंदाचा जून महिना ठाणे जिल्ह्यासाठी अक्षरशः कोरडाच ठरला ..30 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात केवळ 126.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली ..गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 76% ची घट नोंदविण्यात आली आहे. संपूर्ण जून मध्ये महिनाभर नागरिकांना उन्हाच्या झळा सहन केल्या… अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून ने जोर धरला..
-
चेतन चौधरीला घेऊन पोलिस लोहगडावर
केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीला रिक्रिएशन करण्यासाठी पोलिसांकडून लोहगडावरती आणण्यात आले. यापूर्वी सिया गोयल ला रिक्रिएशनसाठी आणण्यात आलं होतं. पोलीस बंदोबस्तामध्ये आरोपी चेतन चौधरी याला लोहगड पोलिसांकडून लोहगडावरती आणण्यात आले…
-
गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस
गोंदिया जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर सातत्याने कायम असल्याने सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, ग्रामीण भागातील रस्त्यांना अक्षरशः नाल्यांचे स्वरूप आले आहे…. दुसरीकडे, या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
-
जालना जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी 2 लाचखोरांना पकडले
जालना जिल्ह्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी धडाकेबाज कारवाई करत दोन वेगवेगळ्या प्रकरणात लाचखोरांना रंगेहात पकडलय. उपविभागी उपविभागीय जलसंधारण अधिकारी संदीप राऊत याने रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचं मस्टर मंजूर करण्यासाठी 1300 रुपयांची लाच मागितली होती तर दुसऱ्या प्रकरणात सेवानिवृत्त तक्रारदाराचे अर्जित रजेच्या फरकाचे बिल मंजूर करण्यासाठी जलसंधारण अधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रमेश खरे याने तीन हजार रुपयांची लाच मागितली.तक्रारदारांच्या तक्रारीवरून जालना एसीबीने सापळा रचला आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून या दोन लाचखोरांना रंगे हात पकडलं. दोघांकडूनही मोबाईल आणि अतिरिक्त असलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली.
-
जालना मंठा रोडवर भीषण अपघात
जालना मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसरात भीषण अपघात झाला आहे.पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकी कार ने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वराला चिरडलं आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही समोर आलाय.या अपघतामध्ये तलाठी दिगांबर कुरेवाड यांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान याप्रकरणी निष्काळाजीपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कारचालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
वसई विरार, नालासोपाऱ्यात रात्रभर पावसाची रिमझिम
वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होती. आज सकाळी मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. शहरात सकल भागात कुठेही पाणी साचलेले नसल्याने विरार वून चर्चगेट आणि चर्चगेट वून विरार जाणारी लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. मागच्या तीन दिवसापासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मात्र सुखावला असून पडणाऱ्या पावसामुळे समाधान व्यक्त करीत आहे.
राज्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. 1 जुलैपासून पाऊस वाढणार असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने आज अनेक भागात अलर्ट जारी केला. केतन अग्रवाल प्रकरणात दररोज अनेक खुलासे होताना दिसत आहेत. आरोपी पोलिस कोठडीत आहेत. सियाचा भाऊ साहिल याच्यावर पोलिसांना थेट संशय आहे. सिया आणि चेतन यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल त्याला कल्पना असल्याचे सांगितले जातंय. राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काल सचिन आहिर यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. हा उद्धन ठाकरे यांना मोठा धक्का आहे. सचिन आहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. आजही राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.