Maharashtra News LIVE : श्रीकांत शिंदे यांचा वंदे भारत ट्रेनने प्रवास, पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद..
Maharashtra News LIVE : पुण्यात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी प्रशासनाला वाहनांच्या वापराबाबतचे निर्देश दिले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील किमान एक दिवस मेट्रो, लोकल, रेल्वे, पीएमपीएमएल बस वापर करावा.

LIVE NEWS & UPDATES
-
कांद्याचे दर घसरल्याने केंद्राचे पथक कालपासून नाशिक दौऱ्यावर
विविध बाजार समित्या आणि नाफेड खरेदी केंद्रांना भेट देत परिस्थितीचा आढावा. आज जिल्हाधिकारी कार्यलयात केंद्रीय पथक आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. अवघ्या ३०० ते ४०० रुपये क्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत. नाफेडकडून १२३५ रुपये क्विंटलने खरेदी सुरू. मात्र ग्रेडिंगमुळे अनेक कांदा उत्पादकांना फटका
-
बदल्यांच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज्यातील परिचारिका आक्रमक
आज राज्यभर ‘तीव्र निदर्शने’ पुण्यातील ससून रुग्णालयातही परिचारिकांनी केली निदर्शने. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदली प्रक्रियेला महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन ने तीव्र विरोध दर्शवला आहे.
-
-
पंढरपुरात पाद्य आणि तुळशी पूजा तसेच व्हीआयपी दर्शन बंद
अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. दररोज एक लाखांहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जूनपर्यंत पाद्य आणि तुळशी पूजा तसेच व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली……
-
गारपिटीच्या नुकसानीपोटी 6 तालुक्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर
:जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसला होता यामध्ये 6 तालुक्यातील जवळपास दीड हजार हेक्टर वरील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून 2857 शेतकरी बाधित झाले होते, या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असून जालना जिल्ह्यासाठी 2 कोटी 52 लाख 90 हजार रुपयांची मदत जाहीर झालीय.
-
पंतप्रधानांच्या आवाहनाला श्रीकांत शिंदे यांचा प्रतिसाद वंदे भारत ट्रेनने प्रवास
पंतप्रधानांच्या आवाहनाला श्रीकांत शिंदे यांचा प्रतिसाद. खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. खासदार श्रीकांत शिंदे यांनी वंदे भारत ट्रेनने केला ठाणे ते नाशिक प्रवास. श्रीकांत शिंदे आज चांदवड,मनमाड,येवला, नांदगाव आणि मालेगाव मतदार संघांची आढावा बैठक घेणार. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी राहणार उपस्थित. आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे घेणार आढावा ..
-
-
संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सुनावणी
दरवेळी सुनावणी घेणारे न्यायाधीश पाटोदकर यांची सात दिवसांपूर्वीच बदली झालेली आहे. यामुळे आजची सुनावणी पाटोदकर यांच्याकडे होते की नवीन न्यायाधीशांसमोर सुनावणीला सुरुवात होते हे पाहणं महत्त्वाचं. आरोपी जयराम चाटे याने न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केलेला आहे त्यावर युक्तिवाद होण्याची शक्यता. घटनास्थळ पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्याची आरोपीच्या वकीलांनी मागील सुनावणीत केली होती मागणी. यावर देखील कोर्ट काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं.
-
पंढरपुरात पाद्य आणि तुळशी पूजा तसेच व्हीआयपी दर्शन बंद
अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. दररोज एक लाखांहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 जूनपर्यंत पाद्य आणि तुळशी पूजा तसेच व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
नाशिकमध्ये विवाहाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
लग्नासाठी वधू मिळत नसल्याच्या समस्येचा गैरफायदा घेतला. नाशिकमध्ये विवाहाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. मुंबई नाका पोलिसांनी मोठी कारवाई केली. विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली लाखोंची उकळपट्टी सुरु होती. लग्न लावून दिल्यानंतर काही दिवसांत नवरी फरार व्हायची. वरपक्षांची योजनाबद्ध फसवणूक सुरु होती.
-
ठाण्यात गावदेवी भाजी मार्केट परिसरात आग
ठाणे रेल्वे स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या गावदेवी भाजी मार्केट परिसराला आज पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील अनेक दुकानं आणि गोडाऊन जळून खाक झालं. ही आग विझवताना धुरामुळे गुदमरून आणि होरपळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
-
सोलापूर विधानपरिषदेच्या जागेवरून मविआमध्ये होऊ शकतो वाद
सोलापूर विधानपरिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक काँग्रेसने पक्षाने लढवावी अशी मागणी. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसची वाढलेली ताकद लक्षात घेता ही निवडणूक काँग्रेसने लढवावी अशी मागणी आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी या संदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली.
-
आजपासून 24 मे पर्यंत मुंबईत किती अंश सेल्सिअस तापमान असेल?
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उकाड्याने नागरिक हैराण आहेत. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवस पारा चाळीशीपार राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये कोरड्या वातावरणाचा अंदाज. 21 ते 24 मे या कालावधीत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल अशी शक्यता आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात सध्या कमाल तापमानाचा पारा नियंत्रणात आहे.
नागपूर शहरात काल तापमान 46.6 अंशावर गेलं होतं. दशकातील सर्वाधिक उष्ण दिवस कालचा ठरला. दुपारनंतर रस्ते ओस पडले होते.यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले. आजही तापमान वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट जाहीर केला आहे. यापूर्वी 27 मे 2024 रोजी नागपुरात 45.6 °c तापमानाची नोंद झाली होती. मात्र यंदाच्या मे महिन्यात उष्णतेने अधिकच भीषण रूप धारण केले आहे. गोंदिया जिल्ह्यात 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 44.9 अंश सेल्सिअस यावर्षीचं सर्वाधिक तापमान आहे. तापमान वाढल्यामुळे गोंदियाकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. विधान परिषद निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत तुळजाभवानी मंदिरातील रेफरल दर्शन पास सेवा बंद राहणार. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा निर्णय. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत नियम राहणार लागू .