Maharashtra News LIVE : जेजुरीमध्ये वारकऱ्यांच्या टेम्पोचा भीषण अपघात
Maharashtra News LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नवीन विक्रम नोंदवण्यात आला आहे, तर गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. पावसाबद्दल देखील मोठी अपडेट समोर येत आहे... यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES
-
जळगावात रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ विद्युत डीपीला आग
जळगावात रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ विद्युत डीपीला आग लागली. मात्र महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला.
वीजपुरवठा बंद करून पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे विझवण्यात आली. पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ ही घटना घडल्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं.
-
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच; भुमरे-सत्तार गटात चढाओढ. आमदार अब्दुल सत्तार यांची चिरंजीव समीर सत्तार तर खासदार भुमरे यांचे चिरंजीव आमदार विलास भुमरे इच्छुक. भाजपची भूमिका ठरणार निर्णायक; मंत्री अतुल सावेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा.२० जुलैला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक; अंतिम निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष.
-
-
सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी अडचणीत
धाराशिव जिल्ह्यात ५४ तक्रारी, १२५ एकरांवर दुबार पेरणीचे संकट. धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या सुरू असतानाच सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे सुरू. जिल्ह्यातील ५ लाख ५४ हजार हेक्टर खरीप क्षेत्रापैकी केवळ २ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी
-
घोड धरणात 82 टक्के पाणीसाठा, उजव्या आणि डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा
शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणामध्ये 82 टक्के पाणीसाठा झाला असुन धरणाच्या उजव्या कालव्यातुन 150 क्युसेस आणि डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे
-
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड मधुन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ
वैष्णवांची वारी आज जेजुरीच्या मल्हारीच्या दारी.. संत सोपान काकांच्या सासवड नगरीतुन पालखी सोहळा मार्गस्थ… आज जेजुरी मध्ये पालखीचा मुक्काम असणार…
-
-
जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा मोठा अपघात
जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा मोठा अपघात झाल्याचे कळतंय. काही वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतंय.
-
नाशिक जिल्ह्यात गतवर्षी 60 यंदा फक्त 34 टक्के खरीप पेरणी
पावसाचा पुन्हा खंड पडल्याने शेतकरी संकटात. १२ जुलैपर्यंत केवळ दोनच दमदार पावसाच्या सरी. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने नाशिक जिल्ह्यात घेतली विश्रांती. ६.४० लाख हेक्टरपैकी अवघ्या २.८० लाख हेक्टरवर पेरणी
जिल्ह्यात खरीप हंगाम लांबण्याची शक्यता. सोयाबीन, मका, बाजरीसह खरीप पिकांच्या पेरणीला मोठा फटका बसण्याची शक्यता. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ९१ टक्के पेरणी. मक्याची पेरणी ५२%, सोयाबीन ३२.५०%, बाजरी २७.६३% -
सोलापूरची जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी ठरली भारतातील ‘बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया
राष्ट्रीय स्पर्धेत 2 पदकांची कमाई करत महाराष्ट्राची मान उंचावली. चेन्नई येथे नॅशनल एक्वेटिक चॅम्पियनशिप नुकतीच पार पडली. या राष्ट्रीय स्तरावरील डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्रासाठी श्रावणीने 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक कमावले, तसेच या राष्ट्रीय स्पर्धेत ‘बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया’ हा सर्वोच्च बहुमान पटकावला. या दोन पदकांच्या कमाईनंतर सोलापूरसह राज्यभरातून श्रावणीचे कौतुक होत आहे
-
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्याच्या नावाने पंढरपूर ला दिंडीचे प्रस्थान
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्याच्या नावाने पंढरपूर ला जाना-या दिंडीचे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातून प्रस्थान झाले. संतवाड़ी येथे रेडा समाधी स्थळ असून ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून निघाला होता..आषाढी वारीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणा-या दिंड्यांपैकी पशूच्या नावाने ही राज्यभरातील एकमेव दिंडी आहे.रेडा समाधीस्थळापासून गेल्या १८ वर्षांपासून दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करते यंदा १९ वे वर्ष आहे. श्रद्धा, इतिहास आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारी ही दिंडी वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे..
-
कांदिवलीतील पोईसर नदीत कचऱ्याचा ढीग, नगरसेविका मनीषा यादव आक्रमक
कांदिवली पश्चिमेतून एक धक्कादायक बातमी. प्रभाग क्रमांक 31 मधील पोईसर नदीत साचलेल्या कचऱ्याचा ढीग पाहून स्थानिक नगरसेविका मनीषा यादव आक्रमक झाल्या आहेत. पोईसर नदी पूर्णपणे कचऱ्याने भरलेली पाहून मनीषा यादव यांनी बीएमसीच्या नाला सफाईच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट सांगितले की, येऊन जागेवर पाहणी करून नाल्याची परिस्थिती बघा.
-
पुणे मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले…
लोणावळा कर्जत दरम्यान बोर घाटात लोहमार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचा काम अध्यापन सुरू आहे या मार्गावरील केवळ मधली मार्गिका सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे उर्वरित दोन्ही मार्गिका अद्यापही बंदच आहेत.
एकाच मार्गिकेवर ताण येऊ नये याकरिता रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकाहून मुंबईला जाणाऱ्या पंचवीस गाड्यांचा मार्ग बदलला आहे 17 जुलैपर्यंत मार्गात बदल करण्यात आला असून या गाड्या आता दौंड मनमाड मार्गे प्रवास करणार आहेत. -
पीएमपीच्या ताफ्यात आणखी 84 नव्या ई बस, गर्दीच्या मार्गावर 200 अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन….
शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या ताब्यात 84 नवीन दिवस दाखल होत आहेत, यामुळे गर्दीच्या मार्गावर दररोज 200 अतिरिक्त फेऱ्या वाढणार असून सुमारे 15 हजार प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
-
पुण्यातील २०४७ पर्यंतच्या लोकसंख्येनुसार जल आराखडा तयार करणार
झपाट्याने वाढणाऱ्या पुणे महानगर क्षेत्रात भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार 2017 पर्यंतचा सर्वसमावेशक जल आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे भविष्यातील सुमारे तीन कोटी लोकसंख्येसाठी 50 ते 60 अब्ज घनफूट पाण्याची गरज भासणार आहे तसेच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच सिंचनावरील ताण कमी करण्यासाठी पाण्याचे नवीन स्रोत शोधण्यावर भर दिला जाणार आहे.
-
डॉक्टर मारहाण प्रकरणावरून डोंबिवलीत मनसे-भाजप आमनेसामने.
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणावरून मनसे, भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधत, “इतकं सगळं झालं तरी तो रवी उगवला, पण आमचा रवी उगवला नाही,” असा टोला लगावला. रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, डॉक्टरांची कमतरता आणि प्रशासनाच्या दुरवस्थेसाठी चार वेळा आमदार राहिलेल्या नेतृत्वालाच जबाबदार धरत राजू पाटील यांनी सवाल उपस्थित केले.
-
32 वर्षीय नराधमाकडून सात वर्षीय मुलीवरती अत्याचार
रविवार असल्याने मुलगी खेळण्यासाठी दुपारी घराबाहेर पडली होती त्याच दरम्यान एका 32 वर्षे नराधमानं तिला एका गोडावनच्या पोट माळ्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी शोधा शोध सुरू केली त्यावेळेस ती मुलगी तेथील गोडावनच्या पोट माळ्यावरती रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. त्यानंतर त्या नराधमाला तेथील स्थानिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्या नराधमाविरोधात पॉस्को अंतरगत गुन्हा दाखल केला असून मुलीला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला दाखल केले. मुलीची परिस्थिती नाजूक असल्याने तिला तात्काळ जे जे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आता त्या मुलीची प्रकृती स्थिर असून त्या नराधमावरती अजून काही गुन्हे आहेत का याचा पायधुनी पोलीस तपास करत आहेत.
-
मीरा भाईंदर मध्ये अयोध्या राम मंदिर निधी गैरव्यवहार प्रकरनावरून मिरा-भायंदर काँग्रेस आक्रमक
मीरा भाईंदर मध्ये अयोध्या राम मंदिर निधी गैरव्यवहार प्रकरनावरून मिरा-भायंदर काँग्रेस आक्रमक झाली आहे. मंदिर निधी चोरीच्या चौकशीसाठी मिरा-भायंदर काँग्रेसनें ‘सांकेतिक सत्याग्रह’ आंदोलन अय्यप्पा मंदिर, पूनम सागर रोड, मिरा रोड येथे केले. दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश राजपुरोहितआणि काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना देखील मागे टाकले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद गटनेते आणि काँग्रेस देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांच्यासह तीन नगरसेवक लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कंटेनर 20 फूट खोल खड्यात कोसळला असून दोघांचा मृत्यू झाला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील पारगाव येथे जुन्या टोलनाक्यासमोर सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर सरकीने भरलेला कंटेनर पलटी होऊन आपघात झाला आहे. तर पावसाबद्दल देखील मोठी अपडेट समोर येत आहे. पुणे येथे जुलै च्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे तर आणखी पुढील तीन ते चार दिवसात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट जाणून घ्या.