AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

17 हजार 471 जागांची भरती, पोलीस भरतीसाठी चक्क डॉक्टरही उमेदवार, मग अभियंते, वकील, एमबीए पदवीधर का नाही बनणार पोलीस

Maharashtra Police Bharti 2024: अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सांगितले की, 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 जणांचे अर्ज आले आहेत. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

17 हजार 471 जागांची भरती, पोलीस भरतीसाठी चक्क डॉक्टरही उमेदवार, मग अभियंते, वकील, एमबीए पदवीधर का नाही बनणार पोलीस
पोलीस भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर यांचे अर्ज
| Updated on: May 04, 2024 | 10:57 AM
Share

राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17 हजार 471 पदांसाठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरु झाली होती. 15 एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले. मग या भरतीसाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांचे अर्ज आले आहे. 17 हजार 471 पदांसाठी 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये पदवीधर आणि पदव्युत्तपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. परंतु त्यात डॉक्टरही आहेत. इंजिनिअर अन् एमबीए म्हणजे व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेतलेले आहेत. वकील, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षितांनाही सरकारी नोकरी हवी आहे. उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल 41 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पोलीस भरतीसाठी अर्जांची संख्या आणि उच्च शिक्षित उमेदवार पाहिल्यावर बेरोजगारीचे वास्तव्य समोर येत आहे.

उच्चशिक्षितांचे अर्ज का

राज्यातील पोलीस दलात जेल वॉर्डन, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल, बँड्समन आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी 29 फेब्रुवारी 2024 रोजी जाहिरात काढण्यात आली. पोलीस भरतीसाठी बारावी उतीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. 15 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. या अर्जांची छननी झाल्यावर डॉक्टर, इंजिनिअर, वकिलांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्याला सरकारी नोकरीचे आकर्षण हे कारण असले तरी बेरोजगारीही कारण आहे.

अशी होणार प्रक्रिया

राज्यात 36 हून अधिक जिल्हा पोलिस तुकड्या पसरल्या आहे. देशातील सर्वात मोठ्या पोलिस दलांपैकी एक महाराष्ट्र पोलीस दल आहे. पोलीस दलात जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना विविध पातळीवर परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यात लेखी चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी झाल्यावर कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी होऊन पोलीस दलात सहभागी होत येणार आहे.

अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सांगितले की, 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 जणांचे अर्ज आले आहेत. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.