AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक-मुंबई प्रवास अवघ्या अडीच तासांत, कसारा घाटातील बोगद्याचे आकर्षण

Maharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबई प्रवासाचा वेळ वाचणार आहे. तसेच इंधनाची बचत होणार आहे. महाराष्ट्रातील पश्चिमेकडील जिल्ह्यांसाठी हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे.

नाशिक-मुंबई प्रवास अवघ्या अडीच तासांत, कसारा घाटातील बोगद्याचे आकर्षण
Maharashtra New Expressway
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 27, 2025 | 9:56 AM
Share

Maharashtra Samruddhi Mahamarg: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला ‘समृद्धी महामार्ग’ पूर्ण क्षमतेने खुला होण्याच्या उंबरठ्यावर आहे. समृद्धी महामार्गाचा ६२५ किलोमीटरचा टप्पा सध्या सुरु आहे. इगतपुरी- आमने भिवंडी ७६ किलोमीटरचा टप्पा मे महिन्यात खुला होणार आहे. यामुळे नाशिक-मुंबई प्रवास अवघ्या अडीच तासांत होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला होण्याच्या उंबरठ्यावर आहे. एक मे महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्ग खुला होण्याची शक्यता आहे. नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी या महामार्गाचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकणमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंज दरम्यान एकूण ८० किमी लांबीच्या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे लोकार्पण केले होते. त्यानंतर ४ मार्च २०२४ रोजी समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरजचेंज इगतपुरीपर्यंतच्या २५ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. आता शेवटच्या आणि चौथ्या टप्पाचे लोकार्पण होणार आहे. यामुळे नागपूर ते मुंबई हा १५ तासांचा प्रवास केवळ ७ तासांत होणार आहे.

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरु झाल्यावर नाशिकहून मुंबई अवघ्या अडीच तासांत गाठता येणार आहे. इगतपुरी ते आमणे हा ७६ किमी लांबीचा हा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये पाच बोगदे आहेत. या बोगद्यांची एकूण लांबी ११ किमी आहे. त्यातील ७.८ किमी लांबीचा एक बोगदा आहे. हा बोगदा देशातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा आहे. या बोगद्यामुळे केवळ आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा प्रवास होणार आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबई प्रवासाचा वेळ वाचणार आहे. तसेच इंधनाची बचत होणार आहे. महाराष्ट्रातील पश्चिमेकडील जिल्ह्यांसाठी हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय