AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Temperature Today : राज्यात दुहेरी संकट, प्रशासनाचा हाय अलर्ट, पुढील 7 तास धोक्याची..

Maharashtra Temperature Today 28th April 2026 : भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यात आजही उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. उष्णतेची लाट कायम राहणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात उष्णता वाढणार आहे.

Maharashtra Temperature Today : राज्यात दुहेरी संकट, प्रशासनाचा हाय अलर्ट, पुढील 7 तास धोक्याची..
Heat Alert
| Updated on: Apr 28, 2026 | 7:16 AM
Share

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पाऊस झाला. एकीकडे उन्ह तर दुसरीकडे पाऊस अशी स्थिती होती. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आजही पाऊस काही जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे. एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकताना दिसत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. यवतमाळ, अमरावती आणि वर्धा येथे परिस्थिती गंभीर आहे. 47 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची नोंद झाली. आजही भारतीय हवामान विभागाकडून विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात उष्णतेचा मोठा इशारा देण्यात आला. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळा. यासोबतच प्रशासनाकडून नागरिकांसाठी काही सूचनाही जारी करण्यात आल्यात. सध्या अकोला शहरात उष्णतेची तीव्र लाट पहायला मिळत असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.

अकोल्याचे तापमान तब्बल 46.9 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून मागील काही वर्षांतील उच्चांक गाठला आहे. या प्रचंड उष्णतेचा प्रत्यय देणारी एक वेगळीच घटना समोर आली आहे. शहरातील काही ठिकाणी नागरिकांनी थेट गरम फरशीवर बेसनाचा पराठा भाजून दाखवला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात विशेष घट होण्याची शक्यता नसून उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी दुपारी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळावे. नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढत असून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेची लाट कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये देखील दुपारच्या वेळी वाढत्या उन्हामुळे रस्त्यावर जास्त गर्दी बघायला मिळत नाहीये. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. देशातील टॉप 5 सर्वाधिक उष्णता असलेल्या शहरांमध्ये अमरावती आणि अकोल्याचा समावेश झाला. राज्यात अगोदर पावसाने कहर केला आणि आता उष्णता वाढत आहे. यादरम्यान जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आव्हान प्रशासनाकडून नागरिकांना केले जात आहे. वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम असून काल तापमानाने 44.6 अंश सेल्सिअसचा एप्रिलमधील उच्चांक गाठला, तर आजही तापमान 44 अंशांच्या वरच नोंदवले जात आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...