AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो सावध व्हा… पुढील दोन दिवस हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात अनियमित पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. कोकणातही उष्णता जाणवेल. विदर्भात मात्र, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानातील बदलांची दक्षता घेणे आवश्यक आहे.

मुंबईकरांनो सावध व्हा... पुढील दोन दिवस हवामान विभागाचा अंदाज काय?
| Updated on: Apr 04, 2025 | 11:12 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच मुंबईतील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. मागील काही दिवसांपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आता हवामान विभागाने शनिवारपासून पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता नसली तरी, मुंबईकरांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कुलाबा येथे कमाल तापमान ३३.९ अंश सेल्सिअस आणि सांताक्रुझ येथे ३४.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाळ्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. उच्च आर्द्रतेमुळे लोकांना तीव्र उकाड्याचा अनुभव येत आहे.

कोकणात दमट हवामान

कोकण विभागात मागील दोन-तीन दिवसांपासून चांगला पाऊस झाला. हवामान विभागाने येत्या रविवारपासून कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे कोकणातील नागरिकांनाही उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.

राज्यातील इतर भागांची स्थिती पाहिल्यास, काही ठिकाणी प्रचंड उकाडा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील चंद्रपूर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतका असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

विदर्भात गारपिटीचा इशारा

यामुळे मुंबई आणि कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. यामुळे उकाडा जाणवेल. तर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामानातील या बदलांमुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.