AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो सावध व्हा… पुढील दोन दिवस हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात अनियमित पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. कोकणातही उष्णता जाणवेल. विदर्भात मात्र, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानातील बदलांची दक्षता घेणे आवश्यक आहे.

मुंबईकरांनो सावध व्हा... पुढील दोन दिवस हवामान विभागाचा अंदाज काय?
| Updated on: Apr 04, 2025 | 11:12 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच मुंबईतील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. मागील काही दिवसांपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आता हवामान विभागाने शनिवारपासून पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता नसली तरी, मुंबईकरांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कुलाबा येथे कमाल तापमान ३३.९ अंश सेल्सिअस आणि सांताक्रुझ येथे ३४.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाळ्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. उच्च आर्द्रतेमुळे लोकांना तीव्र उकाड्याचा अनुभव येत आहे.

कोकणात दमट हवामान

कोकण विभागात मागील दोन-तीन दिवसांपासून चांगला पाऊस झाला. हवामान विभागाने येत्या रविवारपासून कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे कोकणातील नागरिकांनाही उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.

राज्यातील इतर भागांची स्थिती पाहिल्यास, काही ठिकाणी प्रचंड उकाडा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील चंद्रपूर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतका असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

विदर्भात गारपिटीचा इशारा

यामुळे मुंबई आणि कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. यामुळे उकाडा जाणवेल. तर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामानातील या बदलांमुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.