AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा साहित्य संमेलनात गौरव

नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा साहित्य संमेलनात गौरव करण्यात आला.

नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा साहित्य संमेलनात गौरव
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Dec 04, 2021 | 5:22 PM
Share

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितत गौरव करण्यात आला. या सन्मानाने मला अतिशय भरून आले आहे. या संमेलनाचा आवाका आणि परिस्थिती पाहून मला प्रथम काही सुचले असेल ते म्हणजे शासनाने मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, असे डोळे झाकून घोषित करावे, असे आवाहन यावेळी सत्काराला उत्तर देताना शहाणे यांनी केले. यावेळी कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, दादा गोऱ्हे, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, स्वानंद बेदरकर उपस्थित होते.

मूल्यावर आधारित काम

साहित्यिक मनोहर शहाणे म्हणाले की, माझ्या जडणघडणीत लक्ष्मीबाई टिळक आणि कवी कुसुमाग्रज यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. कुसुमाग्रज यांनी मला लिहिण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे माझा हा सन्मान मला प्रेरणा देणाऱ्या कुसुमाग्रज व लक्ष्मीबाई टिळक यांना अर्पण करतो. यावेळी त्यांनी आपल्या जीवनाचा संपूर्ण पट काही कथांमधून मांडला. यावेळी ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर म्हणाले की, महाराष्ट्रात गावागावात जाऊन पुस्तके पोहचविणारी ग्रंथाली चळवळ असून ग्रंथालीने अद्याप पर्यंत 1200 पुस्तके प्रकाशित केले असून, त्यातील 800 पुस्तके ही नव लेखकांची असल्याचे त्यांनी सांगत हा पुरस्कार स्वीकारतांना आनंद होत असल्याचे सांगितले. आपले मूल्य कायम ठेऊन ग्रंथाली आपला प्रवास करत असल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली.

पुराणिक यांचा विशेष सन्मान

पाकिस्तान येथे असलेल्या मराठी भाषिकांशी दर सप्ताहात संवाद साधून मराठी भाषा रुजवीत असलेले दिलीप पुराणिक यांचा सन्मान अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, माजी अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उदघाटन कार्यक्रम पाकिस्तानात ऑनलाइन बघितला गेला असल्याची माहिती प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी दिली.

इतर बातम्याः

Nashik| कंगनाचा राजसत्तेतील काही लोकांकडून उपयोग; कवी आणि अभिनेता किशोर कदमांचे परखड वक्तव्य

Nashik| मी या भाषेत फडफडत राहीन, कोलटकरच्या भिजक्या वहीवरचं कासव कवेत घेईन; अन् अख्खे कविसंमेलन भारावले…!

Devendra Fadnavis: आमच्या आदर्शांनाच अपमानित केलं जात असेल तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे?; फडणवीसांचा थेट सवाल

Follow Us
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?