AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: ‘आंदोलकांना त्रास दिला जातोय, इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहात’, मनोज जरांगे सरकारवर संतापले

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. मात्र या आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.

Manoj Jarange: 'आंदोलकांना त्रास दिला जातोय, इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहात', मनोज जरांगे सरकारवर संतापले
Jarange and CM
| Updated on: Aug 29, 2025 | 7:37 PM
Share

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. जरांगे पाटलांसोबत हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहे. मात्र या आंदोलकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच मी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी हटणार नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जरांगे पाटलांनी सरकारची तुलना ही इंग्रजांशी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जरांगे पाटलांनी म्हटले की, एक दिवसांची परवानगी देण्याचे हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे, सरकारला ही संधी आहे. आरक्षण दिल्यास मराठे तुम्हाला विसरणार नाहीत. कारण आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी हटणार नाही. हे आंदोलन मोडावं की चालू ठेवावं हे सरकारच्या हातात आहे. त्यांनी आरक्षण द्यावं असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहात

पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘मराठ्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. आता सरकारने शौचालये, खाण्यापिण्याची दुकाने बंद केली आहेत. आंदोलकांना पाणी जेवण मिळू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहेत. इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहेत. गरिबांच्या लेकरांना त्रास देऊ नका. सरकार आडमुठात घुसले की मराठेही आडमुठात घुसतील असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

मुंबईत गेल्यावर आमचे हाल केले हे आमच्या लक्षात असेल

जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आंदोलकांना त्रास दिला जात आहे, सरकारने भंगार खेळ खेळणे बंद करावं. तुम्ही आम्हाला इथे त्रास दिला तर तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्हीही त्रास देऊ. मुंबईत गेल्यावर आमचे हाल केले हे आमच्या लक्षात असेल. तुमच्या दारात आलो तर तुम्ही एक-एक दिवसाची रडण्यासारखी परवानगी देताय.

मराठे माज नव्हे तर वेदना घेऊन आलेत

आंदोलकांबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठ्यांची मुलं काही म्हणणार नाहीत, ते माज घेऊन नव्हे तर वेदना घेऊन मुंबईत आले आहेत. मी मराठ्यांसाठी बलिदान देण्यासाठी तयार आहे. आता मी मरेल किंवा आरक्षण मिळवेल. मी एकतर उपोषण करुन मरेल किंवा सरकार मला गोळ्या घालून मारेल, पण मी आता मागे हटणार नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.