मराठ्यांनो परत जा, मनोज जरांगेंनी आदेश सोडला, सरकारने ते पाऊल उचलताच थेट जाहीर केलं; आता मुंबईत…
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. परंतू त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सलाईन लावले आहे. आता त्यांनी नवा प्लान सांगितला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. परंतू त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला जालना जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिला आहे. उपोषणामुळे तीव्र हायड्रेशन झाले असून मेंदू, यकृत आणि किडनी कायमच्या निकामी होण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. या संदर्भात मनोज जरांगे यांनी आता नवा प्लान सांगितला आहे.
मनोज जरांगे पाटील हे पाठोद्यात आहे, त्यांना येथे सलाईन लावण्यात आले आहे. जालना येथे त्यांची तब्येत खराब झाली होती. त्यामुळे जालना जिल्हा शल्य चिकीस्तकांनी त्यांनी आयसीयूत भरती होण्याचा सल्ला दिला होता. डिहायड्रेशनमुळे त्यांचे अनेक अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थिती त्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे यांनी प्लान बदलला आहे. त्यांनी म्हटले आहे की सरकारकडून एक ड्राफ येणार आहे.तो ड्राफ्ट पाहून आपण निर्णय घेणार आहोत. उद्या कोणी असे म्हणायला नको की सरकार निर्णय घेत आहे आणि जरांगे ऐकत नाहीत. त्यामुळे आता आम्ही प्लान बदलला आहे.
माझे मराठ्यांना आवाहन आहे की त्यांनी घाई करुन नये. श्रीगोंदा, हडपसर, पुणे, येथून जेवढे मराठे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत त्यांनी आपण तारीख जाहीर करेपर्यंत मुंबईला निघू नये असे त्यांनी म्हटले आहे. आपण जर आधीच तारीख जाहीर केली तर सरकार यात आडकाठी आणू शकते. त्यामुळे आता लागलीच तारीख जाहीर करणार नाही असे जरांगे यांनी म्हटले आहे. आपण वेळ पडल्यास एकटे सोबत १७ जणांना घेऊन मुंबईतील आझाद मैदानात जाऊ, आपल्या कोण अडवते हे आपण पाहाणार आहोत असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. उद्या दुपारी एक वाजता मुंबईला निघणार आहोत. १८ सप्टेंबरला मुंबईला काही केल्या जाणारच असेही जरांगे यांनी म्हटले आहे. मला कोणी अडवले तर लाखो मराठे मुंबईत येतील असेही त्यांनी म्हटले आहे.
